Bus accident: समृध्दी महामार्गावरील अपघातात नाशिकचे 15 जण जागीच ठार

0
3

Bus accident: जिल्ह्यातील नागरिकांवर काळाचा घाला घातला गेला आहे. राज्यात प्रवास समृध्द होण्याच्या उद्देशाने बनविण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका थांबताना दिसत नाही. या महामार्गावर गेल्या काही दिवसांपूर्वी देखील अपघात झाला. नेहमीच अपघात होत असून अनेकांचे प्राण यात जात आहे. अनेकजण जखमी होऊन जायबंदी होत असल्याचे समोर आले आहे. (Bus accident)

अनेक अपघात झाल्यानंतर नेहमी अपघात होऊन या ठिकाणी कोणतीही प्रभावी उपाययोजना केली जात नाही. मध्यंतरी झालेल्या भीषण अपघातानंतर सरकारने समृद्धी महामार्गावर अनेक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्री दादाजी भुसे यांनी देखील या रस्त्याची पाहणी करून अनेक सूचना केला मात्र त्याचा फायदा काय झालं अशी चर्चा सुरू झाली आहे. संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गावर आज भीषण अपघात झाला असून या अपघातात नाशिकचे 12 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. यात 20 ते 22 जण जखमी झाले असल्याची माहिती आहेत.

रात्री 12.30 ते 12.45 वाजता संभाजीनगरच्या वैजापूरजवळील आगर सायगाव जवळ हा भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर एक ट्रक रस्त्यात थांबलेला होता. पाठीमागून आलेल्या भरधाव खासगी बसने या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बस दूरवर जाऊन उलटी झाली. या अपघातात बसमधील नाशिकचे 12 प्रवाशी ठार झाले, तर 20 ते 22 प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात अत्यंत भीषण होता. यात अपघातामुळे बसचा चुराडा झाला. इतकेच नव्हे तर बसमधील सीट तसेच बसमधील प्रवाशांचे सामान, लहान मुलांची खेळणी सर्व काही रस्त्यावर आस्तावेस्त पडले. सर्व काही अस्तव्यस्त असल्याची माहिती मिळत आहे.

12 प्रवाशी जागीच ठार
खाजगी बस बुलढाण्याहून येत होते. यात सैलानीला गेलेल्या भाविकांची ही खासगी बस होती. बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. त्यावेळी समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन ही बस वेगाने आदळली आहे. त्यामुळे बस उलटून हा भीषण अपघात झाला. या अपघातात 12 प्रवाशांसह एका बालकाचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदतकार्य करतास पंचनामा करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Manoj Jarange | उपमुख्यमंत्र्यांनी ही येडपटं पाळलीच कशी?
आरटीओने ट्रक थांबविल्याने अपघात
रस्त्याच्या कडेला थांबलेला समृद्धी महामार्गावरील ट्रक हा आरटीओच्या अधिकाऱ्यांनी थांबविण्याची माहिती आहे. ट्रक रस्त्यावर थांबल्याने पाठीमागून आलेली खासगी बस ट्रकवर आदळल्याचं सांगितलं जातं आहे. समृद्धी महामार्गावर कोणतंही वाहन थांबविण्याची परवानगी नाही. मात्र असं असताना आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ट्रक अडवून रस्त्याच्या कडेला थांबवला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा ट्रक अधिकाऱ्यांनी थांबवला नसता तर अपघात झालाच नसता असं सांगितलं जात आहे. यामुळे नागरिकांनी आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here