Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराजांच्या माघारीसाठी महायुतीचे जोरदार प्रयत्न

0
60
Shantigiri Maharaj
Shantigiri Maharaj

Shantigiri Maharaj | नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या अनेक राजकीय घडामोडी होताना दिसत आहे. काल मध्यरात्री ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांनी लोकसभेतून माघार घेतली आहे. दरम्यान, आता महायुतीकडून शांतीगिरी महाराज यांना लक्ष्य केले जाणार असून, त्यांची समजूत घालण्यासाठी मंत्री दादाजी भुसे आणि मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.(Shantigiri Maharaj)

तर, आज सोमवारी ६ मे हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे महायुतीच्या गोटात (Mahayuti) चिंतेचे वातावरण आहे. विजय करंजकर आणि शांतीगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभेतून अपक्ष अर्ज भरला होता.  यापैकी करंजकरांची मनधरणी करण्यात दादा भुसे यांच्या शिष्टाईला यश आले असून, करंजकर हे माघार घेत थेट शिंदे गटात आले आहे. यानंतर आता शांतीगिरी महाराज यांनीही माघार घ्यावी आणि गोडसेंना पाठिंबा द्यावा, यासाठी महायुतीकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. (Shantigiri Maharaj)

Shantigiri Maharaj | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतिगिरी महाराजांचे आठ दिवसांचे अनुष्ठान..?

शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम

दरम्यान, शांतीगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, ते निवडणुक लढवण्यावर ठाम आहेत.  मात्र, त्यांची मनधरणी करण्यासाठी नाशिकमध्ये सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. मात्र शांतीगिरी महाराजांचा निवडणुकीतून माघार घेण्यास नकार असून ते अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती बाबाजी भक्त परिवाराने दिली आहे. त्यामुळे नशिक लोकसभेत शांतीगिरी महाराजांमुळे हेमंत गोडसेंच्या मतांवर मोठा फटका बसू शकतो. दरम्यान, आता शांतीगिरी महाराज आपल्या निर्णयावर ठाम राहतात की दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांना यश येते..? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Shantigiri Maharaj)

Shantigiri Maharaj | शांतिगिरी महाराजांच्या एन्ट्रीने नाशिकचे राजकीय वातावरण तापले

Shantigiri Maharaj | करंजकर गेल्याचा आम्हाला आनंदच

दरम्यान,  करंजकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत केला असून, त्यांना जिल्हाप्रमुख पद देण्यात आले आहे. यावरून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी “करंजकरांच्या पक्षप्रवेशामागे बारगेनिंग झाल्याचा आरोप केला आहे. तसेच यामुळे आम्हाला काहीही फटका बसणार नसून, आमचा विजय हा निश्चित असल्याचा विश्वास यावेळी राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी व्यक्त केला आहे. तर, “करंजकर गेल्याचा आम्हाला आनंदच असून, आम्हाला त्यांचा असाही त्रासच होता, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकांनी केले आहे. (Shantigiri Maharaj)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here