Petrol News | टॅंकर चालकांचं आंदोलन; जिल्हाधिकारी काढणार तोडगा?

0
2
Big Breaking
Big Breaking

Petrol News | ट्रक चालकांच्या संपाचा संपूर्ण देशात परिणाम होताना दिसत आहे. यातच मनमाडमध्ये इंधन वाहतूक करणाऱ्या दीड हजार वाहनांची चाकं थांबली असून मनमाडमध्ये इंधन प्रकल्पाबाहेरच टँकर चालकांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनचालक उपस्थित आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा ट्रक चालकांशी चर्चा करण्यासाठी मनमाड येथे दाखल झाले आहेत. पोलीस अधीक्षक शहाजी उमपदेखील या बैठकीला उपस्थित आहेत. मनमाडमधील इंधन प्रकल्पाबाहेर ट्रॅंकर चालकांनी आंदोलन छेडलेलं आहे. तर ट्रॅंकर चालकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक होत आहे.

Gold Silver Rate | नव वर्षाच्या सुरुवातीला असे आहेत सोने-चांदीचे दर

नाशिक शहरात काल रात्रीपासूनच पेट्रोल-डिझेल पंपावर वाहन धारकांच्या रांगाच्या रांगा लागल्याचं पहायला मिळत आहेत. अनेक जण गाडीत तसेच बाटलीत आणि कॅनमध्ये पेट्रोल भरून साठवले जात आहे. तसेच जिल्ह्यात आज दुपारपर्यंत पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक असल्याची माहिती समोर येत असून यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Petrol News | काय आहे नेमकं प्रकरण ?

नवीन मोटार वाहन कायद्यात अपघातास ट्रकचालकाला जबाबदार धरले जाणार असून या कायद्यानुसार दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली आहे. तसेच सात लाख रुपये दंड करण्यात येणार असल्याने नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध केला. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या टँकरचालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असताना देशभरात विविध ठिकाणी सोमवारी आंदोलन करण्यात आले. तसेच नाशिकमधील मनमाड डेपोतून एकही टँकर बाहेर पडले नाही आणि यामुळे मनमाड डेपोतून इंधन वाहतूक ठप्प झाली आहे.

Petrol Breaking | पेट्रोल-डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांना फटका

संपावर लवकरच तोडगा निघेल, नागरिकांनी घाबरून जावू नये

पेट्रोल-डिझेल पंपावर आज संपाचा काही अंशी परिणाम झालेला आहे. तसेच इतर वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मात्र या संदर्भात लवकरच तोडगा निघेल. नागरिकांनी घाबरून जावू नये. नागरिकांना आवाहन आहे की, आवश्यकता असेल तरच इंधनाचा साठा करा. जेणेकरून गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही. सरकारचे संबंधित संघटनेशी बोलणे सुरू आहे. नाशिकमध्ये इंधनाचा तुटवडा अद्याप नाही मात्र नागरिकांची गैरसोय थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पानेवाडीला जावून संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत. यातून नक्कीच सकारात्मक तोडगा निघू शकेल. – दादा भुसे, पालकमंत्री नाशिक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here