Crime news | पैसे नसल्याने आई हतबल, दोन मुलींसह ट्रेन खाली संपवलं आयुष्य

0
17
Pune Crime
Pune Crime

Crime news |  राज्यात अलीकडे आत्महत्यांचे प्रमाण हे खूप वाढू लागले आहे. कौटुंबिक तसेच आर्थिक प्रश्न यामुळे सारासार विचार न करता लोक दुर्दैवाने टोकाचे पाऊल उचलतात. अशीच एक घटना कोकणातील रायगड जिल्ह्यात गोरेगाव येथे घडली असून, जन्मदात्या आईनेच दोन मुलींसह रेल्वेखाली येत आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक तणाव निर्माण झाल्याने आता जगायचे कसे हाच मोठा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर ह्या आईने आपल्या दोन मुलींसह मृत्यूला कवटाळत आपले आयुष्य संपवले आहे. अक्षरशः हृदय हेलावून टाकणारी ही घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे.

“वहिनी मला माफ करा, मी बोलले पण माझ्याकडून नाही होत आहे. मी दोन मुलींना घेऊन रेल्वे खाली आत्महत्या करायला जातेय. मोहनमुळे”, असा मेसेज करून ह्या महिलेने दोन मुलींसह रेलवेखाली आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना ही घडली आहे. मोहनला इकडे येऊन रूम सोडायला सांगा व माझे जे काही देणे आहेत ते त्याला द्यायला सांगा. असाही उल्लेख या महिलेने मेसेजमध्ये केलेला होता.(Crime news)

Raj Thackeray | राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; कारण गुलदस्त्यात

या मेसेजची माहिती ही रीना यांच्या मैत्रिणीला कळताच संबंधित मैत्रिणीने तात्काळ गोरेगाव पोलिस स्टेशन गाठले व रीना यांनी त्यांच्या वहिनीला केलेला हा मेसेज दाखवला त्यानंतर वेगाने सूत्रे हलली परंतु, रीना यांनी तोपर्यंत आपल्या दोन्ही मुलींसह आयुष्य संपवले होते.

गोरेगाव येथील गावडे कॉम्प्लेक्स ह्या वसाहतीत राहणाऱ्या रीना जयमोहन नायर ह्या महिलेने जिया व लक्ष्मी ह्या चौदा व अकरा वर्षांच्या त्यांच्या दोन मुलींसह कोकण कन्या ह्या एक्स्प्रेसखाली पहाटे तीन वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. ह्या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, रीना यांचे यापूर्वीही एक लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून त्यांना एक मुलगी होती आणि दुसऱ्या पतीपासून एक मुलगी अशा दोन मुली रीना यांना होत्या. पण, रीना ह्या आर्थिक संकटात सापडलेल्या होत्या. दोन्ही मुलींचे शिक्षण, खोलीचे भाडं या सगळ्यामुळे रीना ह्या हतबल झाल्या होत्या. अशी प्राथमिक माहिती गोरेगाव पोलिसांच्या तपासात समोर आलेली आहे.(Crime news)

Manoj Jarange | मला कधीही अटक होऊ शकते; मनोज जरांगेंचा आरोप
त्यात त्यांच्यावर कर्जही होते. त्यात पती त्यांना कोणतीही आर्थिक मदत करत नव्हता. त्यामुळे आता जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. रीना ह्या मूळच्या गोरेगाव माणगाव ह्या परिसरातील आहेत. त्यांनी केरळ येथील जयमोहन नायर यांच्याशी प्रेमविवाह केलेला होता. पण, पती दुसरीकडे रहात होता व दोन्ही मुलींची शाळेची फी, क्लासची फी, खोलीचे भाडे, दैनंदिन व्यवहारातील खर्च हे सगळे खर्च भागवणे त्यांना कठीण झाले होते. इतकेच नाही तर, यामुळे त्यांचे मोबाईलचे हप्तेही थकलेले होते. त्यामुळे त्यांनी दोन्ही मुलींसह आपले आयुष्य संपवल्याने माणगाव गोरेगाव परिसर हा हादरला आहे.(Crime news)

या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच, गोरेगाव पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजेंद्र पाटील, सोपान रासकर, ह्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली आणि या आत्महत्या प्रकरणाची नोंद गोरेगाव पोलिस ठाण्यात केली आहे. (Crime news)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here