त्या 12 आमदारांची आमदारकी जाणार? ठाकरेंचा आक्रमक पवित्रा

0
2

द पॉईंट नाऊ ब्युरो : एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येते आहे. आणि ती म्हणजे ही की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि त्यांना साथ देणाऱ्या आमदारांची संख्या ही 40 च्या वर जाऊन पोहोचली. उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घालत आमदारांना परत बोलावले. मात्र एकही आमदार परत आला नाही. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी वेगळाच पवित्रा घेतला असल्याचे दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडून मातोश्री गाठले. तसेच आपण मुख्यमंत्री पद देखील सोडण्यास तयार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. परंतु, तरीही एकाही आमदाराने प्रतिसाद दिला नाही. परंतु आता उद्धव ठाकरे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ठाकरे यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र बरेचसे आमदार बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. अशा 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यामुळे आता ठाकरे – शिंदे हा वाद कायदेशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार असे सांगितले जात होते. मात्र संजय राऊत यांनी ठाकरे राजीनामा देणार नाहीत, असे स्पष्ट सांगितले. आणि आता उद्धव ठाकरे यांनी या 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केल्याने, हे राजकीय शीतयुद्ध अजून पुढे चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here