Supriya Sule | शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; सुळेंची लोकसभेत मागणी

0
4

Supriya Sule |  महाराष्ट्र राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी ही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेत केलेली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या लोकसभेत मांडल्या आहेत.

कधी दुष्काळ आणि कधी अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरीवर्ग हा संकटात सापडलेला असून, त्यांना केंद्राने तातडीने मदत करण्याची सध्या गरज आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज असून, जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.

दरम्यान, लोकसभेत बोलतांना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, संपूर्ण महाराष्ट्र तसेच माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात शेतकरीवर्ग हा सध्या प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ बघायला मिळत आहे. तर, काही ठिकाणी यंदा पाऊसच नसल्याने त्याठिकाणी ओला दुष्काळ असल्याची परिस्थिति आहे.  वातावरण बदलामुळे राज्यातील बळीराजा हा संकटात सापडलेला आहे. (Supriya Sule)

Infotech news | Disney+Hotstar फ्री सब्सक्रिप्शनसह आला हा नवा प्लॅन

द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, आणि सोयाबीन यांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रमधील नाशिक, बुलढाणा व जळगाव ह्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडला आहे. ह्या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत राज्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा

राज्यात काही भागांत ओला दुष्काळ तर काही भागांत कोरडा दुष्काळाची परिस्थिती असल्याने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून, दुसरीकडे दुधालादेखील भाव मिळत नसल्याने दूध उत्पादकही संकटात आहे. संपूर्ण राज्यातील शेतकरी आभाळी संकटात आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने तातडीने महाराष्ट्रात जाऊन पिकांची पाहणी करावी. तसेच महाराष्ट्र राज्याला केंद्राने मदत जाहीर करावी. तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील तातडीने करण्यात यावी आणि त्यांना नवीन कर्ज देखील देण्यात यावे, अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी केली.

हवामान बदलाचा फटका 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे बँकेतून त्यांना कर्ज दिले गेले पाहिजे. सोबतच हवामान बदलाचाही त्यांना फटका बसत असून, यासाठी आपण सर्वांनी मिळून काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्यावर जेव्हा संकट येते त्यावेळी शेतकरी वर्ग आपल्या मदतीला धावून येत असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांचे तातडीने कर्ज माफ करण्यात यावे, असंही यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule)म्हणाल्यात.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here