Shantigiri Maharaj | नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतीगिरी महाराज यांनी आपले नामनिर्देशपत्रासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता त्यांनी त्यांच्यावर औरंगाबाद न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची माहिती लपविल्याची तक्रार तक्रारदार शेख इक्बाल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता निश्चितच शांतीगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
कोणत्याही निवडणुक लढविणाऱ्या उमेवाराला नामनिर्देशपत्रासोबत आपल्यावरील दाखल गुन्हांची माहिती प्रतिज्ञापत्रात सादर करावी लागते. तसेच त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती किंवा जाहीरात वृत्तपत्रांमधूनही देणे बंधनकारक असते. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांनी या अर्जात आपल्यावर एकही गुन्हा किंवा खटला दाखल नसल्याचे म्हटले आहे.
Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराजांच्या माघारीसाठी महायुतीचे जोरदार प्रयत्न
Shantigiri Maharaj | नेमकं प्रकरण काय..?
मात्र, तक्रारदार शेख इक्बाल पटेल यांनी शांतीगिरी महाराजांच्या या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली असून, त्यांनी निवडणूक आयोगाला दिली आहे. यात शांतीगिरी महाराजांच्या विरोधात ‘प्राचीन स्मारक संरक्षण’ या कायद्यानुसार औरंगाबाद सत्र न्यायालयात (क्रमांक ४७/२०२४) हा खटला प्रलंबित आहे. यापूर्वी ते ३ एप्रिल रोजी वकील विलास धोर्डे पाटील यांच्यामार्फत या प्रकरणी कोर्टात हजर राहिले होते. आता त्यांची या प्रकरणाची पुढील सुनावणी ही २५ मे रोजी होणार आहे.
दरम्यान, या सुनावणीच्या निकालावरच शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीचे पुढील भवितव्य ठरणार आहे. तसेच महाराजांनी या खटल्याबाबतची माहिती जाणूनबुजून लपवली असल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे. ही माहिती समोर आल्यामुळे आता आपसूकच महाराजांच्या अडचणी वाढणार आहेत.
Shantigiri Maharaj | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतिगिरी महाराजांचे आठ दिवसांचे अनुष्ठान..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम