नाशिक : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून लहान मुलांना बेठबिगारीसाठी पाठवण्याच्या घटनांत वाढ होत नाही. फक्त जिल्हाच नाही, तर ठाणे अहमदनगर व पालघर या जिल्ह्यातही अशा घटना होत आहे. या मुद्द्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात व राज्यात लहान मुलांना गरिबी व पैश्यांभावी त्यांची विक्री करून बेठबिगारी करण्यास प्रवृत्त केले जात आहे. ह्यातून अनेक मुले बेपत्ता होण्याचा घटनादेखील घडल्या आहेत. ह्या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरु आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ह्याच लहान मुलांच्या वेठबिगारीच्या मुद्द्यावरून आपल्या सोशल मिडिया अकांऊटवरून एक पोस्ट करत राज्य सरकारने ह्या मुद्द्याकडे त्वरित व किमान सहनुभूतीने लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी अश्या बातम्या पुन्हा वाचायला मिळू नये, ही इच्छा व्यक्त केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम