गोदावरी नदीला पूर; दुतोंड्या मारुती कमरेपर्यंत बुडाला

0
1

नाशिक – गेल्या मंगळवारपासून शहर व जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने प्रशासनाने आज सकाळी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासोबत जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. यामुळे गंगापूर धरणक्षेत्रातील पाणीपातळीत वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आज गंगापूर धरणातून सुमारे ५००० क्युसेक इतके पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. ज्यामुळे गोदावरी नदीला पूर आला. यावेळी नाशिकचा पारंपारिक पुरमापक असलेला दुतोंड्या मारुती कमरेपर्यंत बुडाला आहे.

दरम्यान, हवामान खात्याकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार, शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस सुरु असून हवामान खात्याकडून आणखीन काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, येत्या काही दिवसात असाच पाऊस पडत राहिल्यास धरणांमधून आणखीन पाणी सोडले जाऊ शकते. हे गृहीत धरून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here