Congress Survey | महाराष्ट्रात काँग्रेसला अच्छे दिन येणार?; सर्वेमध्ये झाला मोठा खुलासा

0
95

Congress Survey : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यशाची प्राप्ती करणारी महाविकास आघाडी विधानसभेसाठी कंबर कसून सज्ज झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच लोकसभा दणानून सोडल्यानंतर विधानसभेतही विजयाचा झेंडा रोवण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसने नुकतेच एक अंतर्गत सर्वेक्षण घेतले. ज्याच्या निकषांमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस हा सर्वात वरचा पक्ष ठरण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आघाडीतील सर्वात धाकटा भाऊ असल्याचे निकष समोर आल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समोर येत आहे.

Assembly Election | योजनेनंतर मध्य प्रदेशची ‘स्ट्रॅटजी’ही ‘कॉपी पेस्ट’; महाराष्ट्रात भाजपचं ‘मिशन १२५’..?

Assembly Election | लोकसभेनंतर विधानसभेतही काँग्रेस बाजी मारणार? 

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेसला राज्यात 288 पैकी 85 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 55 ते 60 जागा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला राज्यात 32 ते 35 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभेला काँग्रेसला मिळालेल्या जागा आणि विजय :

2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 17 जागा लढवल्या होत्या. त्यातील 17 जागांपैकी 13 जागांवर विजय मिळवण्यामध्ये ते यशस्वी ठरले. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभेत एकूण 21 एक जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 9 जागांवर विजय मिळवण्यात ते यशस्वी ठरले. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागांपैकी 8 जागांवर यश मिळवले होते. तेव्हा या लोकसभा निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीने एकूण 30 जागा जिंकल्या. त्याचबरोबर सांगलीतले अपक्ष खासदार विशाल पाटीलही मविआ सोबत होते.

Vasant Chavan | महाराष्ट्रात काँग्रेसवर शोककळा; नांदेडच्या खासदारांचे निधन

महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन येणार? 

2019 च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून फक्त 1 जागा निवडून आणलेल्या काँग्रेसने यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 17 पैकी 13 जागा जिंकल्या. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असून त्यांची बार्गेनिंग पावरही वाढली आहे. मविआच्या जागा वाटपाबाबत झालेल्या दोन चर्चांमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये विधानसभेच्या एकूण 36 जागा असून ठाकरे गट 20 ते 22 जागा लढवण्यावर ठाम आहे. तर काँग्रेसही 18 जागांसाठी आग्रह धरून बसली आहे. याशिवाय शरद पवार गटाने ही 7 जागांचा प्रस्ताव मांडला आहे. यातील काही जागा सामायिक असल्याने वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here