Ram Mandir | संपूर्ण देश ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होता. टो अभूतपूर्व आणि नेत्रदीपक सोहळा आज अवध नगरीत पार पडला. आज देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. यासाठी देशासह जगभरातून लोक उपस्थित आहेत. तब्बल ५० देशांचे प्रतिनिधी देखील येथे आज राम लल्लांचे दर्शन घेणार आहेत.
Ram Mandir | काय म्हणाले योगी आदित्यनाथ..?
दरम्यान, यावेळी राम लल्लाच्या अभिषेकानंतर भाषणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “जिथे मंदिर बांधण्याचा आम्ही संकल्प केलेला होता. तिथेच राम मंदिर बांधलेले आहे. तब्बल ५०० वर्षांनंतर रामलल्ला त्यांच्या मंदिरात बसले आहेत. जणू काही आज आपण त्रेतायुगातच प्रवेश केलेला आहे. बहुसंख्य समाजाने यासाठी मोठा संघर्ष केलेला आहे. लढा दिलेला आहे. अशा शब्दांत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.(Ram Mandir)
Ram Mandir | प्राण प्रतिष्ठेपूर्वी मोठी बातमी..! श्रीरामांच्या शोभा यात्रेवर दगडफेक
तसेच यावेळी ते म्हणाले की, “आज देशात प्रत्येक घरात प्रभू श्री रामचंद्राचे नाव घेतले जात आहे. रामाचे जीवन हे आपल्याला संयम शिकवते. तसेच भारतीय समाजानेही आजपर्यंत संयम दाखवला आहे. अयोध्या धामचाही विकास केला जात असून, अयोध्येत होत असलेल्या विविध विकास कामांचा पाढा त्यांनी यावेळी वाचून दाखवला. अयोध्या नगरीत विमानतळ व्हावे हे देखील एकेकाळी आयोध्येच्या नागरिकांचे स्वप्न होते आणि ते आज पूर्ण झाले आहे.(Ram Mandir)
Ram Mandir | अयोध्येत आज ‘असे’ असणार कार्यक्रम आणि पूजाविधी
पुढे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “भगवान राम लल्ला हे त्यांच्या भव्य व दिव्य निवासस्थानी विराजमान झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. आज अंत:करण भावूक आहे. नक्कीच तुम्हा सर्वांनाही आज असेच वाटत असेल. या ऐतिहासिक प्रसंगी आज भारताचा प्रत्येक भाग, प्रत्येक शहर, प्रत्येक गाव हे अयोध्या धामच आहे. प्रत्येक मनाला आज रामाचे नाव आहे. प्रत्येक डोळा आनंदाच्या व समाधानाच्या अश्रूंनी ओलावलेला आहे. प्रत्येक जीभ ही आज रामाचा जप करीत आहे. शरीराच्या प्रत्येक छिद्रात आज राम आहेत. जणू आज आपण सर्व त्रेतायुगात आलो आहोत असेच हे संपूर्ण दृश्य आहे. (Ram Mandir)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम