48 तासात वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा कारवाई अटळ पालकमंत्र्यांचा महावितरणला इशारा

0
50
Malegaon
Malegaon

नाशिक: शेतकऱ्यांच्या वाफ्यात पाणी जात नाही तोपर्यंत लाईट जाते हे तातडीने थांबवा अन् शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा द्या असे आदेश आज पालकमंत्री भुसे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. लोकप्रतिनिधी व महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत आज (23 फेब्रुवारी) रोजी नाशिक येथे बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून लाईटचा लपंडाव थांबवा शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. अन्नदाता आपल्यासाठी देव असून तातडीने वीजपुरवठा करा अशा कडक शब्दात पालकमंत्री मा. भुसे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

जिल्हयातील विज समस्या लक्षात घेवून पालकमंत्री मा. दादाजी भुसे यांनी आज लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. यावेळी आ. सुहास कांदे, आ. राहुल आहेर, आ. हिरामण खोसकर आ. देवयानी फरांदे आदी. लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी देखील बैठकीला उपस्थीत होते. ACF फंडातून प्रत्येक तालुक्याला काम देण्यात यावे, नवीन सबटेशन मंजुरीचे प्रस्ताव रखडलेत त्यांचा पाठपुरावा करून काम सुरू करणे. तसेच ज्या कामांना मंजुरी आहे मात्र किरकोळ मंजुरींसाठी काम थांबले असेल ते येत्या आठ दिवसात सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची सूचना पालकमंत्री भुसे यांनी केली.

शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेवून ज्या ठिकाणी शेती पंपाची वीज तोडणी करण्यात आली आहे त्यांची तातडीने जोडणी करणे, विजतोडणीची कारवाई तातडीने थांबवण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. मा. भुसे म्हणाले की शेतकऱ्यांच्या पिकाला शेवटचे एक ते दोन पाण्याची गरज असताना तुम्ही विजतोडणी करत असून हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे हा जुलमी कारभार थांबवा शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही तसेच शेतकऱ्यांना पाण्यावाचून लाईट वाचून पिकांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन यावेळी बैठकीत केले.

जर जिल्ह्याला 100 MW वीज कमी पडते तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था तातडीने करा त्यासाठी संपूर्ण जिल्हा वेठीस धरू नका असे आवाहन यावेळी मा. भुसे यांनी केले. आठ तास वीज देता त्याऐवजी सहा तास द्या मात्र पूर्ण दाबाने वीजपुरवठा करा, येत्या 25 तारखेपासून शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा देण्याच्या सूचना पालकमंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना केल्यात. वीज रोहित्र खराब झाल्यास दोन दिवसात कुठल्याही परिस्थितीत बसवा त्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नका. ज्याठिकाणी शुल्लक कामासाठी वीजपुरवठा जोडणी केली नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या सूचना यावेळी भुसे यांनी केली.

नवीन वीज जोडणी फ्री असताना शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जातात असे आढळल्यास संबंधीत अधिकाऱ्यांनवर कारवाई करा. शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होवू नयेत तसेच रेंगाळू नये यासाठी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांचे नंबर शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना पालकमंत्री भुसे यांनी केली


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here