राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचे देवळा नगरीत जल्लोषात स्वागत

0
71
देवळा येथे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचे भव्य स्वागत करतांना ग्रामस्थ तर दुसऱ्या छायाचित्रात स्वागत करतांना महिला वर्ग (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचे देवळा नगरीत रविवारी दि १ रोजी मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले.
देवळा तालुक्याला सत्ताधारी पक्षाचे प्रथमच मोठे पद मिळाल्याने देवळवासीयांना आनंद झाला.

देवळा नगरपंचायतीच्या वतीने “स्वच्छता ही सेवा” उपक्रम

प्रदेश उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर प्रथमच आपल्या मायभूमीत येणाऱ्या उदयकुमार आहेर यांचा देवळा वासीयांनी ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करत शुभेच्छांचा वर्षाव केला. बहुसंख्य महिलांनी यात सहभाग घेऊन त्यांनी औक्षण केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत मायभूमीच्या व जनतेच्या आशीर्वादाच्या बळावरच आपण हे पद मिळवू शकलो असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर महाराष्ट्रभर पक्ष बांधणीची जी जबाबदारी दिली ती यशस्वीपणे पार पाडण्याचे काम आपण करणार असून देवळा तालुक्याच्या स्थानिक राजकारणात भाग घेणार नसून येथील पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातच त्या लढवल्या जातील असे सांगून तालुक्यातील विकासकामांसाठी महत्वाकांक्षी अशा प्रकल्पांना चालना देण्याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत.

देवळा येथे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचे भव्य स्वागत करतांना ग्रामस्थ तर दुसऱ्या छायाचित्रात स्वागत करतांना महिला वर्ग (छाया – सोमनाथ जगताप)

यावेळी प्रहारचे उमराणे गट प्रमुख आकाश थोरात, शाखाप्रमुख हरिश्चंद्र भोजने, शुभम अहिरराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे अतुल आहेर, जि प सदस्य यशवंत शिरसाठ, नगरसेवक संतोष शिंदे, शांताराम आहेर, प्रदीप आहेर , भाऊसाहेब आहेर, योगेश आहेर, मुन्ना आढाव, मनोज गुजरे, अशोक आहेर, मनोज अहिरराव, किशोर मेतकर, नईम शेख, उल्हास गुजरे, ललित बच्छाव, दीपक पवार, शीतल अहिरराव, मनीषा आहेर, मेघा निकम, सोनाली शिरसाठ, रुपाली अहिरराव, शिवाजी पाटील, अशोक सुराणा, अभिमन आहेर ,हरीश निकम, राजेंद्र राणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान उदय आहेर यांनी पत्रकार परिषद घेत त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढण्याची व न्याय देण्याची भूमिका आपण घेणार असून मांजरपाडा दोन चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले. तसेच चणकापूर उजवा कालव्याची वहनक्षमता वाढवणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून वसाका साखर कारखाण्यासाठी योगदान देणे यावर त्यांनी भाष्य केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here