Tiger Hunting : छत्तीसगड राज्याच्या बिजापूर जिल्हा वन विभागाने काही दिवसांपूर्वी वाघाची कातडी जवळ बाळगणाऱ्यांना अटक केली होत. यावेळी या घटनेचा तपास करत असताना बिजापूर जिल्हा वन विभागाला वीज जणांना ताब्यात घेण्यात यश आल आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यात बहुतांश भाग हा झाडाझुडपांनी अर्थातच जंगलाने व्यापलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जंगल असल्यामुळे जंगली प्राणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. या ठिकाणीच असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये हे प्राणी राहतात. गोंदिया जिल्ह्यातील या जंगला सोबतच मध्य प्रदेश जंगलामध्ये देखील प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो. याचाच फायदा घेत अनेक प्राणी तस्करांकडून या ठिकाणच्या प्राण्यांची शिकार केली जात असल्याचे प्रकार आधी उघडकीस आले होते. असाच एक प्रकार बिजापूर वन विभागाने समोर आणला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याचं यादी अनेकदा अधोरेखित झालं होतं. याचं अनुषंगाने सालेकसा जंगलातून एका टोळीने वाघाची कातडी, नखे, हाडे आणि मिशीचे केस हे छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथील सीआरपीएफ मधील सब इन्स्पेक्टर अमित झा आणि त्याच्या 20 सहकाऱ्यांना विकले असल्याचं समोर आलं आहे. याविषयी जणांना वनविभाग पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान या प्रकरणाचा तपास करत असताना या वाघाची शिकार ही सालेकसा तालुक्यातील शेरपार या जंगलातून करण्यात आली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. यामध्ये मुख्य आरोपी असलेल्या शाकील मरकाम वय 55 वर्ष, सुरज मरकाम व 45 वर्ष, जियाराम मरकाम या तिघांनी या वाघाला करंट लावून मारले असल्याचे कबूल केल आहे. तसेच घटनास्थळावरून वाघाच्या हाडाचे तुकडे मिळून आले असून वाघाचे नख आणि मिशीचे केस आपण विक्री करणार असल्याचे देखील आरोपींनी कबूल केल आहे. तरी यामध्ये त्यांची मदत करणाऱ्या गेदलाल भोयर वय 55, तुकाराम बघेले वय 59, अंगराज कटरे वय 67, वामन फुंडे वय 60 या चारही आरोपींना सालेकसा तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. याचबरोबर शामराव शिवनकर वय 53, जितेंद्र पंडित यादवराव, पंढरी अशोक खोटेले, अशा एकूण 11 जणांना वन विभाग बिजापूर येथील वन अधिकाऱ्यांनी अटक केली असून या सर्वांना बिजापूर छत्तीसगड या ठिकाणी नेण्यात आल आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये वाघांची हत्या केली जात असल्याचं समोर येत आहे. मात्र आजही या ठिकाणी वन विभागाकडून कठोर पाऊल पाऊल उचलण्यात आली नाहीयेत. गोंदिया जिल्ह्यात केली जाणारी वाघांची शिकार कधी थांबेल आणि वन विभाग यावर कठोर कारवाई कधी करेल? असे अनेक प्रश्न या घटनांमुळे उपस्थित झाले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम