स्मशानाबाहेरच मृत्यू त्यांची वाट पाहत होता; शिवसेना नगरसेवकाचे अंत्यसंस्कार करून बाहेर पडणाऱ्या दोघांवर तलवार-चॉपरने सपासप वार

0
33

द पॉईंट नाऊ ब्युरो : स्मशानभूमी मधून बाहेर पडताच दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर येथे घडला आहे. उल्हासनगर येथील शिवसेनेचे नगरसेवक आकाश पाटील यांचे अंत्यसंस्कार नुकतेच पार पडले. हे अंत्यसंस्कार करून स्मशानभूमीमधून बाहेर येत असताना हा जीवघेणा हल्ला बाबू पाटील आणि प्रसाद पाटील यांच्यावर करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रसाद पाटील आणि बाबू पाटील हे स्मशानभूमी मधून बाहेर पडत असतांनाच 5 ते 6 जणांच्या टोळक्याने या दोघांवर जीवघेणा हल्ला केला. तलवार आणि चॉपरने त्यांच्यावर एकामागे एक सपासप वार करण्यात आले. यातील बाबू पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

स्मशानाच्या बाहेर रवी जयसिंघाणी आणि विजय पाटील यांच्यासह अजून काही जण हे रिक्षामधून आलेले होते. प्रसाद पाटील आणि बाबू पाटील यांनी विजय पाटील हा अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या रागातून दोघांवर हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

याप्रकरणी पोलिसांनी रवी जयसिंघाणी याला अटक केली असून, इतरांचा पोलीस शोध घेत आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here