लम्पि आजारामुळे दरवर्षी होणारी ओझर मधील बैलगाडा शर्यत यावर्षी रद्द

0
33

नाशिकजवळ ओझर परिसरात दरवर्षी खंडोबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. राज्यभरातून अनेक बैलगाडा शर्यत प्रेमी नाशिक मध्ये या प्रसंगाचा आनंद लुटण्यासाठी येतात. सध्या राज्यभरात लम्पि आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. यावर्षी देखील ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. परंतु लम्पि आजाराच्या प्रादुर्भावामुळे ही शर्यत रद्द करण्याचा ग्रामस्थानी निर्णय घेतला आहे.

मागील अनेक महिन्यांनपासून राज्यभरात लम्पि आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या आजारामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. ही साथीचे लागण जनावरांना मोठ्या प्रमाणात होत आहे. पशु संवर्धन विभागाकडून यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लम्पीच्या आजारामुळे आता पर्यंत नाशिक जिल्हयात ८३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 692 जनावरांना बाधा झाली असून त्यापैकी 01 हजार 309 जनावरे पूर्णपणे अंबरी झाली आहेत. जिल्ह्यातील 300 जनावरे आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर जिल्ह्यात 99.99 टक्के लसीकरण झाले आहे.

या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये याचसाठी यावर्षी नाशिक जवळील ओझर मध्ये होणारी बैल गाडा शर्यत रद्द निर्णय आली आहे. जोपर्यंत लम्पि आजार पूर्णपणे संपत नाही , तोपर्यंत शर्यतीचे आयोजन करता येणार नाही. या आजाराचा पूर्णपणे नायनाट झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या उत्सहाने आणि जोमाने या शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here