स्वामी विवेकानंदांचे युवकांना पुस्तक वाटप करत केला राष्ट्रीय युवा दिन साजरा

0
30

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथील आदिवासी मुलांचे वसतिगृहात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्या संकल्पनेतून नेहरू युवा केंद्र नाशिक समन्वयक पुनाजी ठवळे यांच्या प्रयत्नांतून जवळपास सत्तर विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांचे पुस्तकांचे वाटप करत १२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.

दुपारी वसतिगृहातील दालनात सर्व विद्यार्थ्यांसमवेत घेतलेल्या कर्ताक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे होते. सर्व मान्यवरांचा वसतिगृहाचे पाटील यांनी परिचय करून देत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख मान्यवर व युवकांचा गुलाब पुष्प देऊन नेहरू युवा केंद्राचे समन्वयक पुनाजी ठवळे यांनी यथोचित सन्मान केला.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्र्यावर बोलण्यासाठी संधी दिली त्यानंतर
१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस आहे. ज्याला आपण विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिन म्हणून देखील दरवर्षी साजरा करत असतो. १२ जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची देखील जयंती आहे. स्वामी विवेकानंद कोण होते? भारतात आजवर अनेक थोर विद्वान महापुरुष होऊन गेले स्वामी विवेकानंद त्यांच्या मधीलच एक थोर अध्यात्मिक विद्वान व्यक्ती तसेच सामाजिक नेता होते.

स्वामी विवेकानंद यांचे विचार अणि जीवन चरित्र आजच्या तरूण पिढीला जीवन जगण्याची प्रेरणा देते. स्वामी विवेकानंद हे त्यांच्या तर्कनिष्ठ विचार अणि आवेशपुर्ण भाषण या दोन गोष्टींमुळे आजही अत्यंत प्रसिद्ध आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी जीवनाचा विचारांचा थोडक्यात परिचय द्यायचा म्हंटलाच तर स्वामी विवेकानंद हे भारतातील तरूण पिढीसाठी एक आदर्श नेता होते अमेरिका ह्या देशात शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्व धर्म परिषदेत आपल्या भारत देशाचे अणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व पार पाडले होते.

स्वामी विवेकानंद हे फक्त ३९ वय होईपर्यंत जगले म्हणजे फार अल्प जीवन त्यांना लाभले होते पण ह्या अल्पकालीन जीवनात त्यांनी जे अनमोल कार्य केले जे अमुल्य विचार समाजाला दिले ते देशातील तरूणांना पिढयान पिढया मार्गदर्शन करेल युवा पिढीला प्रेरित करण्याचे काम करतील. स्वामी विवेकानंद यांचा संपुर्ण जीवनप्रवास आपणा सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. वयाच्या अवघ्या २५ ते २६ व्या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी भगवे कपडे परिधान करत संन्यास स्वीकारला अणि संपूर्ण भारतात भ्रमंतीचा पायी प्रवास केला. या पायी प्रवासात विवेकानंद यांनी अनेक देशांना भेट दिली. भारतातील संस्कृती तत्त्वज्ञान हिंदू धर्माचा जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार प्रसार केला.

स्वामी विवेकानंद यांनी आपल्या जीवनकाळात विविध धर्मातील महत्वाचे पवित्र धर्मग्रंथ वाचले त्यांचे ज्ञान ग्रहण केले.

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ मध्ये कोलकता येथे झाला होता. त्यांना स्वामी विवेकानंद हे नाव त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी दिले होते.स्वामी विवेकानंद यांचे अमुल्य विचार समाजाला अणि देशातील तरूण युवा पिढीला योग्य दिशा दाखवण्याचे मार्गदर्शन करण्याचे काम करतात. म्हणून त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. आजच्या युवा दिनी काहीतरी उपयोगी पडेल अनेकांचे जीवन बदलेल याच उदान्त हेतूने स्वामी विवेकानंदांचे पुस्तक वाटप करत आजचा हा राष्ट्रीय युवा दिन आपण साजरा करत आहोत. असे सविस्तर माहिती आपल्या भाषणात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी विशद केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांचे पुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी केकरे याने केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, नेहरू युवा केंद्र समन्वयक पुनाजी ठवळे, वसतिगृहाचे पाटील, शिपाई दरेकर आदी उपस्थिती होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here