नाशिक : गेल्या काही दिवसांपासून व्हॉटसअप व अन्य माध्यमातून मुले पळवण्याच्या अफवा पसरवल्या जात असून अश्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात लहान मुले पळवण्याच्या अफवा पसरल्या जात असून, काही ठिकाणी त्यांना मारहाण झाल्याची घटना देखील घडली आहे. आता नाशिकमध्येही या अफवांचे लोण पसरले असून, नुकताच शहरासह जिल्ह्यातही अश्या निरापधरांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी या माध्यमांतून येत असलेल्या अफवांवर विश्वास व ठेवण्याचे आवाहन सचिन पाटील यांनी केले आहे.
यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळवून नेऊन जाणाऱ्या टोळ्या आल्या आहेत, अश्या अफवा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अश्या कुठल्या टोळ्या सध्या जिल्ह्यात सक्रीय नाहीत. तरी यासंदर्भात आपणांस आवाहन करतो, की अश्या कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर अश्या काही अफवांच्या व त्यासंदर्भात काही घटना घडल्यास त्वरित पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर आपण संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम