Ramdas Athawale | ‘आम्ही असताना राज ठाकरेंची गरज काय!’; रामदास आठवलेंच खोचक विधान

0
22
#image_title

Ramdas Athawale | मंगळवार 17 सप्टेंबर रोजी डहाणू येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवलेंनी मराठा आरक्षणासह वाढवण बंदर आणि इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यावेळेस पत्रकारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत राज ठाकरे सहभागी होणार का असा प्रश्न विचारल्यानंतर “आम्ही असताना राज ठाकरेंची गरज काय?” असे खोचक वक्तव्य त्यांनी केले.

Political News | ‘जरांगेंचे लाड हे जातीयवादी…’; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

“वाढवण बंदरामुळे देशाचा विकास होणार”- रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रशासनाकडून सामाजिक सक्षमीकरण शिबिर व शासनाच्या योजनेअंतर्गत अपंगांना निःशुल्क सहायक उपकरणांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत डहाणू येथील सेंट मेरी विद्यालयात विद्यार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. तेव्हा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले तिथे उपस्थित होते. त्यांनी डहाणू तालुक्यातील प्रस्तावित वाढवण बंदराविषयी बोलताना, बंदरामुळे देशाच्या विकासात भर होणार असून बंदरामुळे विस्थापित होणाऱ्यांचे योग्य नियोजन शासनाकडून करण्यात येईल, शिवाय यामुळे साधारण चार लाख लोकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे सांगितले. तसेच आम्ही सुरुवातीपासूनच मराठ्यांसोबत असून त्यांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहोत. असे देखील ते यावेळी म्हणाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here