खाद्यतेल सुट्टे विकल्यास होईल दंड; केंद्र सरकारचे आदेश…

0
61

द पॉइंट नाऊ: खाद्यतेलामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी केंद्र शासनाने सुटे तेल विक्रीवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रात राज्य शासनाच्या वतीने याला काही वर्षे मुदतवाढ दिली जात होती. मात्र, महाराष्ट्रातही मागील सहा ते सात महिन्यापासून याबाबत कोणतेही अध्यादेश आलेले नाहीत. यामुळे अन्न आणि औषधी प्रशासनाच्या वतीने सुटे तेल विकणायांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याबाबत नाशिक विभागात तपासणी मोहीम राबविली जात आहे.

केंद्र सरकारचे आदेश

खाद्य तेलात होणाऱ्या भेसळीच्या तक्रारी वाढल्यानंतर केंद्र शासनाने यापूर्वीच सुटे तेल विक्रीवर बंदी घातली आहे. यामुळे कोणत्याही प्रकारे सुटे तेल विक्री करता येत नाही, याबाबत कारवाई झाल्यास संबंधितांवर दंडासह कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारकडून वारंवार मुदतवाढ

केंद्र सरकारने सुटे तेल विक्रीवर बंदी घातली असली तरी हा निर्णय राज्यात राबविण्याबाबत राज्य शासनाला निर्णयाचे स्वातंत्र्य असल्यामुळे राज्यात गेली काही वर्षे या निर्णयाला मुदतवाढ दिली जात आहे.

भेसळी रोखण्यासाठी निर्णय

सुटे तेल विक्रेत्याकडून कितीही दावा केला जात असला तरी त्यात अन्य तेलाची भेसळ आहे किंवा नाही याबाबत कोणतीही शास्वती देता येत नसल्याने सुटे तेल विक्रीस बंदी करण्यात आली आहे. यासाठी विक्रेत्यांना दंड करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

अन्न व औषधी प्रशासनाकडून तपासणी मोहीम

सणासुदीच्या काळात अन्न आणि औषधी प्रशासन विभाग सक्रिय झाला असून, भेसळ युक्त खाद्यपदार्थांबरोबरच सुटे तेल विक्रीवरही कारवाई करण्यात येत आहे. विभागाच्या वतीने वेळोवेळी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यामुळे विक्रेत्यांनी दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

व्यावसायिक विक्रीला परवानगी

सुटे तेल विक्रीस बंदी असली तरी ग्राहकांच्या गरजेपुसार पॅकिंग असलेले तेल सुट्या स्वरूपात विकण्यास विक्रेत्यांना परवानगी आहे. पॅकिंग असलेल्या १५ लिटरच्या डब्यामधून ग्राहकाला पाच लिटरच हवे असेल तर तसे विक्रेता देऊ शकतो.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here