द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिकमधील हर एक प्रकारचे सौंदर्य सर्वांना मोहित करून टाकते. प्रभू रामचंद्रांचे पद या भूमिस लागल्याने ही भूमी पावन झाल्याने सर्वांना या भूमीबद्दल विशेष भाव आहे. याच नाशिकच्या गोदाकाठावरील रामसेतू पूल हा नागरिकांच्या श्रद्धेचा, जिव्हाळ्याचा भाग आहे. हा रामसेतू पाडण्यास नाशिककरांनी विरोध दर्शवला आहे.
ब्रिटिश काळात हा पूल बांधला गेलेला आहे. 1930 सालापासून काळाराम मंदिरात जाण्यासाठी या पुलाचा वापर झालेला आहे. मात्र या सेतूची झालेली बिकट अवस्था पाहता, स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत नमामी गोदा प्रकल्पाच्या अनुषंगाने हा रामसेतू पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हा पूल पाडल्यास नाशिककरांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पुलाची डागडुजी करावी, तो दुरुस्त करावा परंतु तो पाडू नये अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.
याआधी नाशिककरांनी सिटी सेंटर मॉल जवळ असलेला पुरातन वटवृक्ष तोडण्याला विरोध करत तो वाचवला. आता या रामसेतूसाठी देखील नाशिककर सरसावले आहेत
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम