नाशकात सकाळपासून पावसाची संततधार; पाणीकपातीतून होणार सुटका

0
43

नाशिक – गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस बरसत असताना नाशिककडे मात्र पावसाने पाठ फिरवली होती. आज मात्र सकाळपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस पडत असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.

गंगापूर धरणक्षेत्रामध्ये काही दिवस शिल्लक राहिल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने नाशिककरांची चिंता वाढली होती. मात्र आजच्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिक सुखावला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत साधारणपणे १८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

शहराबरोबरच जिल्ह्याच्या इतर ठिकाणी बळीराजाला दमदार पावसाची बरसात सुरूच आहे. पावसाळीपूर्व शेतीची कामे पूर्ण झाली असून सध्यास्थित शेतकऱ्यांवरचे दुबार पेरणीचे संकट तूर्तास टळले आहे. आतापर्यंत त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने भातपिकांच्या आवणीला वेग आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसाची अशीच संततधार सुरू राहिल्यास त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील पर्यटकांना आकर्षित करणारे छोटे मोठे धबधबे पर्यटकांच्या गर्दीने खुलून जाणार आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरूच असल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्र्यंबकेश्वरसह आंबोली घाटात कोसळधार नसली तरी थोड्या प्रमाणात पावसाची संततधार सुरूच आहे परिणामी काल गंगापूर धरणात १५० दलघफु पाणी वाढले आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी गंगापूर धरण पूर्णपणे भरण्यासाठी नाशिककरांना गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची वाट पहावी लागणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here