Nashik | नाशिकमध्ये युवा शेतकऱ्यांचे गळ्यात कांद्याच्या माळा घालून मतदान

0
39
Nashik
Nashik

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : Nashik |  महाराष्ट्रातील १३ जागांवर आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. यामध्ये दिंडोरी नाशिकसह धुळे लोकसभा मतदारसंघातही मतदान पार पडत आहे. सध्या या ठिकाणी कांद्याचा प्रश्न लक्षवेधी ठरत असून, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघात यावरच सर्वाधिक चर्चा होताना दिसत होती. त्याचा मतदानावर देखील परिणाम झाल्याचे दिसत आहे.

सकाळी दहाच्या सुमारास दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या एका लक्षवेधी घटनेमुळे येथील मतदान केंद्रावर काही काळ खळबळ निर्माण झाली. काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चक्क आपल्या गळ्यात कांदे आणि टोमॅटोच्या माळा घालून मतदानाचा हक्क बजावला. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील युवा शेतकरी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणावर रोष आणि निषेध व्यक्त करत कांद्याच्या माळा घालून मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले.

Nashik Lok Sabha Voting | नाशिकमध्ये इतके मतदान; राजाभाऊंचे सिन्नर आघाडीवर

नेमकं काय घडलं..?

परंतु त्यांना पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर अडवलं आणि कांद्याच्या माळा काढून मतदान करण्यास सांगितलं. “ज्यांनी केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेची संधी” अशा घोषणाही या तरुणांनी यावेळी दिल्या. या प्रकारामुळं वडगाव येथे मोठा जनसमुदाय जमा झाला होता. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शांततेचं आव्हान करत वातावरण नियंत्रणात आणलं.

चार दिवसांपुर्वी पंतप्रधान नेरेंद मोदी यांच्या पिंपळगाव येथील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत “कांद्यावर बोला” म्हणून जोरदार घोषणाबाजी केली आणि आज प्रत्यक्ष मतदान सुरू असताना कांदा उत्पादक शेतकरी गळ्यात कांद्याच्या माळा घालून मतदान करण्यासाठी आले. ही घटना संपूर्ण मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली व प्रत्येक बुथवर चर्चेचा विषय झाली.

Dindori Loksabha Voting | दिंडोरी आघाडीवर; ‘या’ तालुक्यांमध्ये सर्वाधिक मतदान

या घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं की, “मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेल्याने मतदान अधिकारी त्यावर काही करू शकत नाहीत. त्यामुळं मतदान करा, कांद्याच्या माळा घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही असं नका करू. कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा. जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. – छगन भुजबळ (अन्न व नागरी पुरवठा मंत्री)

संपूर्ण दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक गंभीर विषयाला हात न घालता. कांद्याच्या भावांवर आणि लादलेल्या निर्यात बंदी बाबतीत काहीही भाष्य न केल्यामुळे किरण सानप यासारखा तरूण भर सभेत ‘कांद्यावर बोला’ म्हणून पंतप्रधान मोदींना विनंती करतो. मोदी साहेबांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना जाणून त्यावर भाष्य केले असते तर शेतकऱ्यांनी नक्कीच स्वागत केले. – कुबेर जाधव (समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here