Nashik | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिलेला आहे. कालच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटिल यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर काल खासदार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी हा राजीनामा पक्षाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे.
दरम्यान काल खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक शहरातील शिवस्मारकावर सुरु असलेल्या उपोषण स्थळावर भेट दिली होती. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला आणि राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर काही वेळातच खासदार हेमंत गोडसे यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल झाले असून त्यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीवर आपला राजीनामा दिल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे नाशिकमधून पहिल्यांदा हेमंत गोडसे यांनी आपला राजीनामा दिला असून लवकरात लवकर मराठा बांधवाना आरक्षण द्यावे, अशी मागणी राजीनाम्याद्वारे करण्यात आली आहे. मात्र कोणत्याही खासदाराचा राजीनामा हा लोकसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सचिवालयकडे द्यायचा असतो, मात्र हेमंत गोडसे यांनी पक्षाचे प्रमुख म्ह्णून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
पत्रात नक्की काय म्हटलंय ?
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाच्या भावनांचा होणारा उद्रेक पाहून मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन मराठा समाज आरक्षणासाठी झटत आहे. आरक्षण नसल्याने शिक्षण आणि नोकऱ्या मिळणेकामी मराठा समाजातील मुलांची मोठी कुचंबना होते आहे. मागील आठवड्यापासून पुन्हा आरपारच्या लढाईसाठी समाजातील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. यामुळे राज्यभरातील तमाम मराठा समाजामध्ये आता आरक्षण मिळालेच पाहिजे, आता नाही तर कधीच नाही अशी तीव्र भावना निर्माण झालेली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असल्याने मराठा समाजाच्या भावनांचा आता राज्यभर उद्रेक होऊ लागलेला आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना विचारात घेऊन मी आपल्या पक्षाचा लोकसभा सदस्य असल्यामुळे माझ्या खासदारकीचा राजीनामा आपणांकडे सादर करीत असल्याचे या पत्रात म्हटलेले आहे.
Maratha andoln: मराठा हृदयसम्राट जरांगेंनी घेतला मोठा निर्णय
नाशिकचे अकार्यक्षम खासदार हेमंत गोडसे यांनी दिलेला राजीनामा हा त्यांच्या सारखाच फसवा
नाशिकचे अकार्यक्षम खासदार हेमंत गोडसे यांनी दिलेला राजीनामा हा त्यांच्या सारखाच फसवा आहे. त्यांनी तो राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सोपवावा. नाशिकचे पर्मनंट अकार्यक्षम खासदार हेमंत गोडसे यांनी फडणवीस-शिंदे-अजित पवार यांच्या समाजद्रोही भूमिकेवर बोलल्यास त्यांच्या भूमिकेत दम आहे, सत्यता आहे असे समाज मानेल. नाशिकला गेल्या 10 वर्षांत खड्ड्यात घालणारे, जनतेच्या पैशातून कारखाने विकत घेणारे, अब्जावधींची संपत्ती ‘कमावणारे’ हेमंत गोडसे आपल्या मुलांना पेट्रोल पंप, कंपनी काढून देऊन रोजगार देऊ शकतात, स्थिरस्थावर करू शकता, कामधंद्याला लावू शकतात. मात्र राजकीय अनास्थेमुळे सामान्य जनतेच्या नोकऱ्या नाशिकच्या औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या, उद्योग हे नाशिक सोडून गेल्याने कायमच्या संपल्या, अनेकांच्या उद्योग धंद्यांवर गाढवाचा नांगर फिरला आहे. ट्रॅफिक जाम नाशिकचे पर्मनंट अकार्यक्षम खासदार हेमंत गोडसे हे येणाऱ्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने फसव्या राजीनाम्यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेच्या पैशातून स्वतःच्या पुढील ७० पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या खासदार हेमंत गोडसेंनी निदान असे फसवे नकली राजीनामे देऊन मराठ्यांच्या सर्वसामान्यांच्या मुलाबाळांची खूप काळजी असल्याचे ढोंग तरी करू नये.- संतोष यशवंत गायधनी (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड) नाशिक.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम