द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (इगतपुरी) : नाशिकच्या इगतपुरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे जमावाने एका 20 वर्षीय तरुणीची हत्या केली असून, तीन घरे जाळण्यात आली आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
इगतपुरी मधील अधरवड येथील कातकरी वस्तीमध्ये पहाटे 3 वाजेच्या सुमारास हत्या करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्याच्या बारशिंगवे येथील 10 ते 12 जणांच्या टोळक्याने ही हत्या केली असून, त्यांनी कातकरी कुटुंबाची तीन घरे देखील जाळली आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वस्तीमधील शरद महादू वाघ यांचे बारशिंगवे येथील लोकांशी जमिनीवरून सध्या वाद सुरू आहेत. आणि हे वाद सध्या अधिकच वाढल्याने 40 ते 50 लोक लाठ्या-काठ्या घेऊन कातकरी वस्तीत आले होते. मात्र त्यावेळी हा वाद काहींच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला. मात्र शनिवारी पहाटे त्यातील 10 ते 12 जण पुन्हा वस्तीत शिरले व शरद वाघ यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, वाघ यांची नांदगाव तालुक्याच्या न्यायडोंगरी येथील 20 वर्षीय मेहुणी लक्ष्मी हिने मध्ये येण्याचा प्रयत्न केला असता, तिच्यावर वार झाला. ज्यात ती जागीच गतप्राण झाली. दरम्यान, या टोळक्याने शरद महादू वाघ, शंकर ज्ञानेश्वर वाघ, अलका संजू वाघ यांची घरे देखील जाळून टाकली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम