शिर्डी : या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात लढत रंगणार आहे. आज राज्यात तिसऱ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, यातच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
यानुसार, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत रूपवते यांच्या गाडीच्या समोरील काचा फुटल्या असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहेत. मात्र, उत्कर्षाताई रुपवते या सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)
निवडणुकीत धोका वाटत असल्यामुळे हल्ला
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचा जोरदार प्रचार सुरू असून, विरोधी उमेदवारांना उत्कर्षा रूपवते यांचा निवडणुकीत धोका वाटत असल्यामुळे त्यांच्यावर राजकीय द्वेषातूनच हा हल्ला करण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते या गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून वंचित बहुजन आघाडीत आल्या आहेत.(Maharashtra Politics)
त्या शिर्डी लोकसभा मतदान संघातून उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिर्डीची जागा ही ठाकरे गटाला मिळाल्याने येथे ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज असलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आणि वंचितकडून त्या शिर्डी लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. काल रात्री अकोले राजूर जि. अहिल्यानगर येथून प्रचारदौरा संपवून त्या संगमनेरला परत येत असताना रस्त्यालगतच्या झाडीतून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला, अशी माहिती रुपवते यांनी दिली आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra politics | शपथ घेण्यापूर्वी मी दोन तास प्रॅक्टीस केली – डॉ. भारती पवार
Maharashtra Politics | रुपवते यांनी सांगितले नेमके काय घडले..?
दरम्यान, याबाबत रात्री रुपवते यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की,”अकोले राजूर (जिल्हा अहिल्यानगर) येथील प्रचारदौरा संपवून मी संगमनेर येथे परत येत असताना माझ्या गाडीवर अचानक दगडफेक झाली. या हल्ल्यातून मी सुखरूप असून, या क्षणी मी राजूर येथील पोलीस स्टेशनमध्ये आहे. कृपया कार्यकर्त्यांनी घरीच राहावे. राजूरच्या दिशेने कोणीही येऊ नये आणि संयम राखावा. आपल्याला ही निवडणुक तडीस न्यावयाची आहे. तरी उद्या माझा कोपरगाव येथील पूर्वनियोजित दौरा हा ठरल्याप्रमाणेच होणार असून, आपण सर्व तिकडे भेटुयात, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. (Maharashtra Politics)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम