देवळा : कृषी निविष्ठा वरील जीएसटी रद्द करण्यात यावी, किसान सन्मान निधी वाढवून मिळावी, उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला योग्य दर मिळावा व त्या अनुषंगाने कायदा करावा या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्ली येथे १९ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय किसान संघाच्या वतीने गर्जना रॅली काढली जाणार आहे.
दिल्ली येथे रामलीला मैदानावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी बहूसंख्येत यात सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय किसान संघाचे प्रांत उपाध्यक्ष रावसाहेब शहाणे-पाटील यांनी केले आहे. त्या अनुषंगाने देवळा तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील दोनशेहून अधिक शेतकरी या रॅलीसाठी जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष हेमराज सोनवणे व जिल्हा संघटक चंद्रकांत चव्हाण यांनी दिली. भारतीय किसान संघ हे शेतकऱ्यांसाठी चालवलेले बिगर राजकीय शेतकरी संघटन असून या माध्यमातून कांदाभाव, कांदा निर्यात तसेच इतर शेतमालाबाबत विविध मागण्या करत त्यांचा पाठपुरावा केला जाणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम