राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | बांधकाम क्षेत्राचा कणा असलेल्या वीटभट्टी व्यवसायाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून मागील दोन ते तीन दिवसांपासून अचानक कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. ऐन हंगामात विजांच्या कडकडाटासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिक संकटात सापडला आहे.
कोरोना काळात या व्यवसायावर मंदीचे सावट पसरले होते. आता कोरोना काळ गेल्याने विटांचे मागणी वाढल्याने दर देखील वाढले आहेत. यंदा वीटभट्टी व्यवसाय सर्वत्र तेजीत असून, विटांची मागणीदेखील वाढली आहे. विटेचा सध्या जागेवर प्रत्येकी ७ रुपये दर, तर जागेवर पोच ७.५० रुपये दराने विक्री होत आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून घरघर लागलेल्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले होते. मात्र, अवकाळी पावसाने पुन्हा या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.
Igatpuri | इगतपुरीत मतदानाबद्दल उदासीनता; राजकीय भूमिकांचा परिणाम
जोरदार अवकाळी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कच्च्या विटांचा चिखल झाला आहे. अलिकडच्या दहा वर्षात अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरल्याने स्पर्धेतून दर्जेदार विटांची निर्मिती टाकेद परिसरासह तालुक्यात केली जात आहे. तालुक्यात लहान मोठे व्यवसायिक, शेतकरी शेतातील मातीचा उपयोग करून मजुरांवर आर्थिक गुंतवणूक करत वीटभट्टी व्यवसाय करतात.
मात्र, यावर्षी अचानक वातावरणात बिघडले असून, अवकाळी पावसाने पुरती दाणादाण उडवली. परिणामी, या व्यवसायासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी करणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री कोसळणाऱ्या पावसामुळे विटांचे सरंक्षण करण्यासाठी व्यावसायिकांना वेळच मिळाला नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊन वीट व्यावसायिक संकटात सापडले आहेत. तरी प्रशासनाने वीट भट्टीचे नुकसान झाले याची दखल घेऊन नुकसानग्रस्त वीट भट्टी व्यवसायिकांना आर्थिक मदत जाहीर करत आधार द्यावा, अशी मागणी व्यवसायिक वर्गाकडून करण्यात येत आहे.
Igatpuri | सार्वजनिक विहिरीतील पाणी गायब; महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या
तेजीत आलेल्या व्यवसायाला अचानक अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने सरंक्षणात्मक उपाययोजना करता आली नाही. त्यामुळे कच्च्या विटांच्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मोठा आर्थिक फटका बसला आहे.
– नंदू जाधव, वीट उत्पादक
“कच्चा माल तयार करण्यासाठी कोळसा, माती ,तूस, राख यांसह मजुरांवर आर्थिक गुंतवणूक केली असून ऐन मोसमात सर्व मेहनतीवर पाणी फिरले असून अवकाळी पावसामुळे कच्च्या विटांचा चिखल झाला आहे.यामुळे लाखों रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.”
– रामनाथ जाधव (वीटभट्टी व्यवसायिक टाकेद बु.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम