पोलीस ठाण्यासाठीचा मोर्चा रद्द मात्र, साखळी उपोषण सुरू

0
41

द पॉईंट नाऊ: सिडकोत अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलीस ठाणे निर्मिती करावी या मागणीसाठी नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु याबाबत पोलीस आयुक्त जयंत नाइकनवरे यांनी सोमवारी (दि. १०) पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत बैठक आयोजित करून दिल्याने मोर्चा स्थगित करून चुंचाळे कारगील चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. पालकमंत्री यांच्या बैठकीनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे व रामदास दातीर यांनी दिली.

अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दत्तनगर, घरकूल आदी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी ही अनेक वर्षांची मागणी पूर्ण करावी यासाठी स्थानिक नागरिकांसह नाशिक ते मुंबई पायी मोर्चा दि. ८ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार होता. मात्र पोलीस आयुक्त जयंत नाइकनवरे यांनी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे व रामदास दातीर ग्रामस्थांसमवेत बैठक घेतली. पोलीस आयुक्त कार्यालयाकडून नवीन पोलीस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले व दि. १० ऑक्टोबर रोजी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत बैठक आयोजित करून दिली.

तत्पूर्वी शनिवारी दि.८ ऑक्टोबर रोजी चुंचाळे कारगील चौकात सकाळी ९ वाजता नागरिक जमा झाले. यावेळी चौक सभा झाली. यात पालकमंत्री यांच्या समवेत बैठक झाल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल तोपर्यंत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला व मोर्चा तात्पुरता स्थगित करून चुंचाळे कारगील चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणात ज्योती कवर, शशिकांत दातीर, विष्णू फडोळ, उत्तम मटाले, नवनाथ शिदे, संपत पिंगळे, जितू माळवे, गणेश पवार, अरुण दातीर, समाधान दातीर, नितीन दातीर, गणेश दातीर, विनायक भोर, सतीश अरोटे, नारायण राऊत आदी नागरिक सहभागी झाले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here