Crime news | राज्यभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच, ऐन दिवाळी सणात छत्रपती संभाजीनगरात दोन तरुण शेतकऱ्यांनी आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. गंगापूर तालुक्यातील सावंगी गावातील ३८ वर्षीय शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे तर,
दुसऱ्या घटनेत कन्नड तालुक्यातील गव्हाली तांडा येथील ३५ वर्षीय तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. ३८ वर्षीय गणेश वसंत पवार आणि ३५ वर्षीय अंकुश हिम्मत चव्हाण असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत.
गंगापूर तालुक्यातील सावंगी या गावात राहणारा शेतकरी गणेश पवार याच्यावर बँकेचे कर्ज होते. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून सतत अतिवृष्टी आणि यंदा कोरडा दुष्काळ आहे. त्यामुळे बँकेकडून घेतलेलं कर्ज कसे फेडायचे याची गणेश पवार यांना सतत चिंता असत. त्यामुळे ते सतत तणावाखाली होते.
दिवाळी सण असल्यामुळे सणाची खरेदी कशी करायची या मनःस्थितीत शनिवार (११ नोव्हेंबर) रोजी पवार घरातून निघून गेले व संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परतलेच नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला तरी ते सापडले नाही. धक्कादायक म्हणजे दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मार्तंडी नदीजवळच्या एका शेतात गणेश पवार यांचा मृतदेह आढळून आला.
Nashik | शिवमहापुराण कथेचं मैदान पुन्हा बदललं; मंडप भूमिपूजन सोहळा उद्या
स्वतःच्या शेतात आत्महत्या
दुसरीकडे कन्नड तालुक्यातील गव्हाली तांडा येथील ३५ वर्षीय अंकुश चव्हाण यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. वडिलांच्या नावावर असलेली तीन एकर खडकाळ जमीन कसून अंकुश चव्हाण हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. याच शेतीवर अकुंश यांच्या वडिलांनी त्यांना ट्रॅक्टर घेऊन दिला होता आणि शेतीसाठी उधार बियाणे, खतेही खरेदी केलेले होते.
पण, यंदा अपेक्षित पाऊस झाला न झाल्याने मकाचे पिक वाळून गेले. त्यात शेतीसाठीचं कर्ज, ट्रॅक्टरचे हप्ते फेडायचे कसे त्यामुळे हतबल झालेल्या अकुंशने सोमवारी पहाटे स्वतःच्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ऐन दिवाळीत या दोन तरुण शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
देवळा बसस्थानकात व्यावसायिकांकडून लक्ष्मीपूजन
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम