राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : गणरायाचे आगमन होताच इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात गुरुवार ता. १ सप्टेंबर दरम्यान रात्री अकरा वाजे जोरदार ढगफुटी झाली चार पाच तासांत जवळपास१६५ मी मी इतका पाऊस या भागात पडल्याने या ढगफुटीतील पाण्यामुळे अडसरे फळवीर वाडीतील पाझर तलाव अचानक फुटला, बंधाऱ्याच्या वरील म्हैसवळण घाट रस्ता पूर्ण खचला मोठं मोठ्या दरडी कोसळल्या सर्वत्र परिसरात प्रचंड पुराचे साम्राज्य पसरल्याने सर्वत्र एकच हा हा कार उडाला आहे.
परीसरात अंधार पसरला होता सर्वत्र अंधार आणि पुराचे साम्राज्य व जोरदार पाऊस या परिस्थितीत इगतपुरी चे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बचाव कार्य चालू केले व बंधाऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकरी ग्रामस्थांची सुखरुप सुटका करत प्रसंगावधान राखत सर्व नियंत्रणात आणले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु या पुरात या भागातील शेकडो हेक्टर जमिनींचे मोठे नुकसान झाले.
अनेकांची शेती रस्ते वाहून गेली अनेकांच्या शेताची बांध फुटली, विहिरी जमीनदोस्त झाल्या,मोटारी पाईपलाईन सह झाडांसह शेती पिकांची मोठे नुकसान झाले. काही तासांत होत्याच नव्हतं झालं.याच नुकसानीची शनिवार ता.०४ दरम्यान राज्याचे ग्राम विकास मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अडसरे फळविर वाडी येथील बंधाऱ्याचे घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत या परिसरातील नुकसानीची पाहणी केली. दरम्यान या परिसरातील नुकसान पाहता तात्काळ हा फुटलेला बंधारा दुरुस्ती करण्यात यावा जे ने करून या भागातील पाणी प्रश्न मार्गी लागेल,लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शासन स्तरावर नुकसान भरपाई साठी प्रयत्न करावे अशा सुचना पालकमंत्री गिरीष महाजन यांनी अधिकारी वर्गाला दिल्या.
या पाहणी दौऱ्यात नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाधरण डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सह ल पा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर, स्थानिक तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक आदींसह सर्वच शासकीय अधिकारी यावेळी उपास्थित होते दरम्यान शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देऊन त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, म्हैसवळण घाट रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करावा, कृषी पंढरी अथवा कोणतीही शासकीय योजना लागू होत असेन ती योजना राबवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी दुरुस्ती करून द्याव्यात अशी मागणी शेतकरी दत्तू चौरे, मनोहर चौरे,किरण साबळे, भारतिय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे,तालुका संघटन सरचिटणीस तानाजी जाधव,सागर साबळे, सरचिटणीस संजय झनकर, ओ बी सी आघाडी तालुका सरचिटणीस भरत रायकर, सरपंच सतू साबळे आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.
यावेंळी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष केदा आहेर, जेष्ठ नेते अशोक महाले, आमदार राहुल ढिकले आदींसह सर्व शेतकरी बांधव यावेळी उपास्थित होते.
“ढगफुटीमुळे फुटलेला बंधारा लवकरच दुरुस्ती केल्या जाईल,शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.सदर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.”
– गिरीष महाजन (ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम