द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक शहरात 29 मे पासून पुढील 15 दिवस जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी हे आदेश दिले आहेत.
मागील काही दिवसांत कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद उद्भवले गेले आहेत. महादेव मंदिर वाद, भोंगा वाद अशा एक ना अनेक कारणांनी राज्यातील वातावरण तापलेले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलन निघू नये, याची दक्षता म्हणून पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरात हे आदेश लागू केले आहेत. येत्या 12 जून पर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे.
या कालावधीत कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणे, मोर्चे काढणे, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणे, गाड्यांवर झेंडे लावून फिरणे, महाआरती करणे, कोणत्याही प्रकारचे स्फोटक पदार्थ अथवा शस्त्र जवळ बाळगणे यास बंदी असणार आहे.
दरम्यान, लग्नकार्य, धार्मिक विधी, सिनेमा गृहे यांना हा आदेश लागू राहणार नाही. याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्तालयाद्वारे करण्यात आल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम