राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील मुख्य असणाऱ्या भात पिकाचे अवकाळीने मोठे नुकसान झाले आहे पीकविमा कंपनीने याची अद्यापही दखल घेतली नसुन याबाबत विम्याचा लाभ व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे इगतपुरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.
वाडीवर्हे येथे पालकमंत्री दादा भुसे यांनी पोपट मालुंजकर कुटुंबियांच्या घरी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी इगतपुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश जाधव, रामदास बाबा मालुंजकर, कारभारी नाठे, दशरथ मालुंजकर, रावसाहेब मालुंजकर, अनिल मालुंजकर, तानाजी करंजकर, दिलीप मालुंजकर, सुरेश धोंगडे आदींनी दादा भुसे यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून यंदाच्या खरीप हंगामात दरवर्षीप्रमाणे भात पिकाचे अवकाळीने मोठे नुकसान झाले याची विमा कंपनीने अद्यापही दखल घेतली नसुन अनेक भातपिकांवर मावा, करपा, तुडतुडे आदी रोगांचा मोठा प्रादूर्भाव झाल्यानेही भातपीकाचे मोठे नुकसान झाले त्यामुळे लागवड खर्चही निघाला नसुन शेतकरी मोठ्या संकटात आला आहे.
कृषी विभागाने याची दखल घेतली नसल्याने शेतकरी नुकसानभरपाईपासुन वंचीत आहे. सदर प्रश्नांची दखल घेऊन पीकविमा कंपणीनेही शेतकऱ्यांचे विमे पास करावे तसेच शासनाकडूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली यावर पालकमंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम