नवी दिल्ली: मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अल-कायदा या दहशतवादी संघटनेने दिल्ली, मुंबईसह अनेक राज्यांमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे. प्रेषित मुहम्मद यांच्या सन्मानासाठी लढणार असल्याचे अल-कायदाने म्हटले आहे. दहशतवादी संघटनेचे हे वक्तव्य अशावेळी आले आहे जेव्हा भाजपच्या काही नेत्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
अल कायदाच्या वक्तव्यात म्हटले आहे की, ‘आम्ही आमच्या पैगंबराचा अपमान करणाऱ्यांना ठार मारू. आमच्या अंगावर आणि आमच्या मुलांच्या अंगावर स्फोटके बांधून पैगंबराचा अपमान करणाऱ्यांना आम्ही उडवून लावू. अपमान करणाऱ्यांनी दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमध्ये आपला अंत होण्याची वाट पाहावी.
हिंदूंना मारण्याचा इशारा
अल कायदाने (AQIS) प्रसारमाध्यमांना एक पत्र जारी करून भारतातील हिंदूंना मारण्याचा इशारा दिला आहे. आत्मघातकी हल्ल्यात पैगंबरांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात बोलणाऱ्या जगातील प्रत्येक व्यक्तीला आम्ही मारून टाकू, असे या पत्रात लिहिले आहे. त्याच वेळी, त्यांनी स्वतःला पैगंबरांच्या प्रतिष्ठेसाठी एक सेनानी असल्याचे सांगितले आहे.
पोलिसांकडून शोध सुरु
या पत्रात टीव्ही चॅनेल्समधील चर्चेदरम्यान भाजपच्या प्रवक्त्यांनी पैगंबरावर केलेल्या टीकेचा स्पष्ट उल्लेख आहे. सोशल मीडियावर जारी करण्यात आलेल्या या पत्राची सुरक्षा यंत्रणा आता चौकशी करत असून हे पत्र कुणी सोशल मीडियावर अपलोड केले आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम