करोना महामारी नंतर नेत्रदानाचे प्रमाण घटले…

0
37

द पॉईंट नाऊ: वेगवेगळ्या कारणांनी दृष्टी हरपलेल्यांचे आयुष्य नेत्र प्रत्यारोपणातून पुन्हा प्रकाशमान होण्याची उमेद असते. मात्र, करोनाच्या महामारी व त्यानंतर उद्भवलेल्या म्युकरमायकोसिस आणि जनजागृतीच्या अभावामुळे नेत्रदानाचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे अनेक सृष्टीहीन बाधितांना त्यांचे जीवन प्रकाशमय होण्याची प्रतीक्षा आणखीनच लांबली आहे. एका वर्षात साधारणतः २०० ते २५० रुग्णांना बुबुळाची गरज सध्यस्थितीत आहे. परंतु, जुलै महिना अखेरपर्यंत केवळ ६६ जणांची नेत्रदान केल्याचे आकडेवारीतून समजते.

नयनरमनाच्या अनुभूती करता तसेच मानवनिर्मित विविध सुशोभित वस्तूंचा अनुभव घेण्यासाठी डोळ्यांची गरज असते. मात्र, काही व्यक्ती जन्मतः तर काहींची, अपघाती कारणांमुळे दृष्टी हिरावली जाते. अशा दृष्टिहीन व्यक्तींना आपल्या अंधारमय जीवनात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. अशा दृष्टिबाधितांपैकी बहुतांश अंध व्यक्तींना प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतून पुन्हा दृष्टी मिळवून देता येऊ शकते. त्यासाठी नेत्र दात्यांची गरज असते. मात्र, नेत्रदानाचे प्रमाण कमी झाले असल्याने दृष्टिबाधितांना आपल्या जीवनातील प्रकाश किरणे अनुभवण्याची प्रतीक्षा वाढत आहे. रुग्णालये,सामाजिक संस्था तसेच शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून नेत्रदानाचे प्रमाण वाढत होते. पण अशातच करोना संसर्ग आणि त्यानंतर म्युकरमायकोसिस मुळे नेत्रदानाच्या प्रक्रियेला धक्का बसला आहे. करोना महामारी येण्यापूर्वी २०१९ मध्ये तब्बल २१३ जणांनी नेत्रदानाच्या चळवणीत सहभाग घेतला होता. पहिल्या लाटेदरम्यानही नेत्रदान करण्यास चांगला प्रतिसाद होता. मात्र, दुसऱ्या लाटेनंतर म्युकरमायकोसिसच्या वाढलेल्या धोक्यामुळे अनेकांनी नेत्रदान टाळले.

सामाजिक स्तरावर नेत्रदान संकल्पाची गरज आहे. यासाठी नागरिकांनी मृत्यूपश्चात नेत्रदानाचा संकल्प करत तसा अर्ज नेत्रपेढीकडे द्यावा. तसेच आपल्या या निर्णयाची त्यांनी कुटुंबियांनाही माहिती द्यावी. ज्यांनी नेत्रदानाचा संकल्प केलेला होता अशा व्यक्तीचे निधन झाल्यानंतर खबरदारी घेत संबंधित नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदान करता येऊ शकते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here