दररोज शेकडो महिलांचे शारीरिक शोषण व विनयभंगाच्या घटना – राजयोगी ब्रह्मकुमार जितेंद्र भाई

0
46

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : आपल्या संस्कृती मध्ये कित्येक वर्षांपासून रक्षाबंधन केले जाते, परंतु तरीसुद्धा वर्षाकाठी भारतात महिला अत्याचाराच्या चार लाखांवर घटना घडतात, दररोज शेकडो महिलांचे शारीरिक शोषण व विनयभंगाच्या घटना घडतांना दिसतात.

नैराश्या पोटी भारतात दीड लाख महिला- पुरुष, तर जगात कित्येक लाख लोकं वर्षाकाठी आत्महत्या करतात. मात्र आता रक्षाबंधनाचे खरे रहस्य समजून रक्षाबंधनाला अर्थपूर्ण रित्या साजरी करण्याचे आवश्यकता आहे. रक्षाबंधनाचे औचित्य साधून सदर घटनांना आपण पायबंद घालण्याचे आवाहन करूया. असे विचार राजयोगी ब्रह्माकुमार जितेंद्र भाई यांनी व्यक्त केले.

येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पंचवटी केंद्रात झालेल्या रक्षाबंधन विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाशिकच्या उपक्षेत्र संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदिजी अध्यक्ष स्थानी होत्या, त्यांनी उपस्थितांना राक्षसुत्र बांधून आशीर्वचन दिले.
जितेंद्र भाई पुढे म्हणाले की वर्तमानात होणारे कलह हे आपापसातील स्नेहसंबंध बिघडल्याने होतात.

यांस मोबाईल सुद्धा कारणीभूत आहे; आपण जवळच्यांना विसरलो. नको त्या दुसऱ्या संबंधांना अवाजवी महत्त्व देत बसलो; त्यामुळे आता परिवार व समाज सुधारण्या बरोबरच स्वतःलाही सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःतील शक्तीला ओळखा, ती शक्ती जागृत करा. हे सांगताना ते म्हणाले की, पद- प्रतिष्ठा- पावर हे सर्वस्व नसते. यावेळी त्यांनी प्रचंड संपत्ती असलेल्याने कशी आत्महत्या केली, तसेच एका प्रसिद्ध कंपनी चा मालक कसा स्वतःच्या मुलामुळे रस्त्यावर आला, अशी उदाहरणे दिली.

सफलतेचा खरा अर्थ हॅपिनेस म्हणजेच जीवन जगण्याचा आनंद होय. म्हणून आपल्या आत्म्यास ओळखा. सकारात्मकता रहा; हे सांगतानाच त्यांनी अब्दुल कलाम यांचे उदाहरण दिले. प्रत्येकाच्या मनात पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता असल्यास, चांगले विचार मनात आल्यास, परिवर्तन निश्‍चित होईल. हे सांगतानाच त्यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया तर्फे घेण्यात येणाऱ्या मेडिटेशन कोर्स करण्यावर भर दिला.
ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.

ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी संस्थेच्या मिडिया प्रभागाची माहिती देऊन माउंट आबूला वेळोवेळी मिडिया संमेलन आयोजन होत असते, तसेच संमेलन येथील मध्यम प्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास नाशकातही घेण्यात येतील. प्रसार माध्यम प्रतिनिधींना चिंतन मनन करण्यासाठी व तणावमुक्त होण्यासाठी अशा प्रकारचे संमेलन व येथील साप्ताहिक कोर्स करणे आवश्यक असल्याचे दिलीप भाई यांनी सांगितले.

ब्रह्माकुमार राजन भाई यांनी आभार प्रदर्शन केले. प्रसंगी स्मित हर्ष एज्युकेशन अकादमी तर्फे राजेश बेदमुथा व सी ए लोकेश पारख यांनी जितूभाई यांचा स्प्रिचुअल युथ आयकोन स्मृती चिन्ह देऊन सन्मान केला. ब्रह्माकुमार जितु भाई यांनी देश विदेशातील युवकांमध्ये अध्यात्मिक जनजागृती केल्याबद्दल सदर पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमांत सर्व माध्यम प्रतिनिधी व आलेल्या पाहुण्यांना रक्षाबंधन व अल्पोपहार देण्यात आला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here