शौर्याने लिहलेल्या गाथा पुढील पिढीला मार्गदर्शक – मिसेस इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी

0
48

देवळाली कॅम्प : देशसेवा करणाऱ्या प्रत्येक लष्करी अधिकारी व जवानाला सर्वात प्रथम राष्ट्रहित जोपासावे लागते त्यामुळे नागरिकांनी केवळ एक दिवसापुरती देशभक्ती न दाखवता लढताना शहिद झालेल्या जवानांप्रती कायम ऋणी राहणे गरजेचे असून त्यांनी आपल्या शौर्याने लिहलेल्या शौर्यगाथा या पुढील पिढीला मार्गदर्शक ठरतील असे प्रतिपादन मिसेस इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी यांनी केले.

लामरोड येथे आदर्श सैनिक संस्थेच्या वतीने पुलवामा दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी फ्लायिंग ऑफिसर प्रभाष.व्ही.उपाध्याय, अनिल कल्याण सिंग, हवालदार जगन्नाथ शिरसाठ, नायक सुभेदार दिलीप कुमार सिंग, हिरेन उदानी, रमेश खंडांगळे, विनायक जाधव, कैलास आडके, अक्षय एडके, भूपेंद्र येवले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून सेनि. नायक दीपचंद यांनी शहिदांचे स्मरण करत राहणे हे आपल्या संस्थेचे उद्दिष्ट असून हेच खरे देशाचे हिरो असून त्यांच्या बलिदानामुळे देश सुरक्षित असल्याचे सांगितले.

यावेळी पुलवामा हल्ल्यातील ४० शहिदांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात येऊन शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार प्रशांत धिवंदे यांनी केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here