द पॉईंट नाऊ ब्युरो : लातूर शहरामध्ये सोयाबीन चोरीची घटना घडली आहे. लातूर शहरामध्ये एका गोडावूनवर दरोडा टाकून तब्बल 16 लाखांचे सोयाबीन दरोडेखोरांनी लंपास केले.
चोरी करणाऱ्याला केवळ पैसे हिच बाब महत्वाची असते. मग ते त्यासाठी कोणत्याही थराला जातातच. आत्तापर्यंत आपण कांदे, डाळिंब असे चोरीला गेल्याचे ऐकले होते. आता तर थेट गोडावूनवरच दरोडा टाकून 16 लाखांचे सोयाबीन चोरून नेले.
लातूर शहराच्या खंडापुर भागात हा प्रकार घडला. सहा आरोपींना या प्रकरणी 24 तासांच्या आत अटक केली. या आरोपींसह 2 ट्रक देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. हेच ट्रक या घटनेत वापरण्यात आले होते.
MIDC पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करून या आरोपींना अटक करत ट्रक ताब्यात घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम