मराठी भाषेचे संवर्धन ही काळाची गरज : न्यायमूर्ती पाटील

0
33

अश्विनी भालेराव
नाशिक प्रतिनिधी : मराठी भाषेचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन न्यायमूर्ती वसंत पाटील यांनी केले. कामगार कल्याण केंद्र नेहरूनगर नाशिक यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वसंत शिवराम पाटील हे बोलत होते.

गुणवंत कामगार विलास गोडसे, ज्येष्ठ कवी अशोक भालेराव, रवींद्र मालुंजकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कविसंमेलनात न्यायमूर्ती वसंतराव पाटील, गुणवंत कामगार विलास गोडसे, अशोक भालेराव, रवींद्र मलुंजकर, प्रा डॉ कृष्णा शहाणे, अनिल मनोहर, चंद्रकांत ढासे, गणेश पवार, विशाल टर्ले, माणिकराव गोडसे, राजेन्द्र वाघ, रामचंद्र शिंदे, आदींनी आपल्या काव्य रचना सादर केल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here