नाशिक प्रतिनिधी : भाजपा या नगरपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष म्हणून समोर आला ,पूर्वी हा पक्ष म्हणजे शहरी व व्यापाऱ्यांचा पक्ष, अशी ओळख असणार्या भाजपाने नगर परिषदांच्या निवडणुकीत दैदिप्यमान कामगिरी केली असून. जिल्ह्यातील, एकूण 102 जागांपैकी सर्वाधिक 30 जागा जिंकून हा पक्ष जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरला. या कामगिरीने ग्रामीण भागातही भाजपने हातपाय पसरण्यास सुरूवात केल्याचा अर्थ काढला जात आहे.
मात्र या 30 जागांमध्ये एकट्या भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या 15 जागा आहेत. भाजपाने ज्या काही जागा जिंकल्या, त्यात जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी देवळा नगर परिषदेत 15 जागा जिंकल्या तर जिल्ह्यातील बाकी नेत्यांनी 15 जागा जिंकल्या आहेत. यामुळे एका बाजूला केदा नाना आणि दुसऱ्या बाजूला मंत्री भारती पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यासारखे दिगग्ज नेते एका पारड्यात आहेत. जिल्ह्यात भाजपा एक नंबरला आणण्यात केदा आहेरांचा मोठा वाटा असतांना देखील त्यांनी कुठेही श्रेयवादाचे राजकारण केले नाही. केदा आहेर हेच या विजयाचे श्रेयास पात्र आहेत.
तर दुसऱ्या बाजूला मंत्री भारती पवार या त्यांचे अपयश झाकण्यासाठी सुरगाण्याकडे बोट दाखवत आहेत. त्यांना अजूनही त्यांचा पराभव मान्य नाही हे दुर्दैवीच आहे. त्यांनी मोठ्या मनाने प्रभाव स्वीकारणे गरजेचे असतांना त्या स्थानिक राजकारणात स्वतःला अडकून घेत आहेत हे प्रगल्भ राजकारणाला न शोभणारे आहे. कोण कुठे हारले त्यापेक्षा आपली रॅली होऊनही भाजपाच्या जागा घटल्या याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम