दिलीप बांबळे
सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील टाकेद सह परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून जिओ ४ जी मोबाईल नेटवर्कचा सर्रासपणे लपंडाव चालू असून सततच्या नेटवर्क समस्यांमुळे या परिसरातील ग्राहक हैराण झाले आहे.
दरम्यान इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरात जवळपास पंचवीस ग्रामपंचायती आणि चाळीस वाड्या वस्त्या असून या परिसराची अंदाजे लोकसंख्या पन्नास हजारांच्या आसपास आहे.या भागातील लोकसंख्येच्या सरासरीत जवळपास साठ ते सत्तर टक्के ग्राहक हे रिलायन्स जिओ ४ जी मोबाईल नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात वापर करतात परंतु गेल्या दोन महिन्यांत जिओ नेटवर्कचा या भागात सर्रासपणे लपंडाव चालू असल्याने या कारणास्तव या परिसरसतील ग्राहक ग्रामस्थ नागरिक शालेय विद्यार्थी,शासकीय निमशासकीय कर्मचारी वर्ग त्रस्त झाला आहे.
दरम्यान जिओ ४ जी (रिलायन्स) कंपनीने सुरुवातीला जिओ मार्फत ग्राहकांना मोफत इनकमिंग,आऊट गोइंग सुविधा दिल्या,नेट पॅक मध्ये कमी दरात सवलती दिल्या. यामुळे दुसऱ्या कंपनीचे सिमकार्ड वापरणाऱ्या बहुतांश ग्राहकांनी मोठ्याप्रमाणात मोबाईल सिम कार्ड पोर्टल करून जिओ मध्ये (रूपांतरित) कन्व्हर्ट केले.त्यानंतर जिओ ने नेटवर्क सुविधा देखील चांगल्या प्रमाणात सुरळीत सेवा दिली.परंतु दोन वर्षानंतर जिओ मोबाईल नेट पॅक मध्ये दिवसेंदिवस वाढ होत गेली.
आणि काही महिन्यांपूर्वी कॉल इंनकमिंग साठी,मेसेज पॅक साठी देखील ग्राहकांना रिचार्ज मारावा लागला.
सुरुवातीला सर्व सेवा सुविधा जिओकडून ग्राहकांना मोफत व माफक दरात दिल्या गेल्या jio to jio call free,त्यानंतर मात्र रिचार्जच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली आहे.यामुळे मोबाईल नेटवर्क साठी सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे.
सध्या ८४ दिवसांसाठी ६६० रुपयांचा नेट,आऊटगोईंग व इंनकमिंग व प्रति दिवसाला दीड ते दोन जि बी नेटवर्क डाटा पॅक आहे. तर हाच पॅक सुरुवातीला ३०० रुपयांपासून ते ४४९ पर्यंत होता.दरम्यान कोरोनाच्या आर्थिक संकटात सर्व जग होरपळून निघाले असतांना सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारा मोबाईल रिचार्ज ग्राहक नाविलाजाने मारतात परंतु गेल्या दोन तीन महिन्यात जिओ नेटवर्कचा सर्रासपणे होत असलेला लपंडाव यामुळे मोबाईल ग्राहकांना अवाजवी पैसे घालून देखील मोबाईल नेटवर्क च्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
मोठ्या प्रमाणात कॉल ड्रॉप होणे,सर्रासपणे अवैध नंबर दाखविणे,नेटवर्क अचानक मधेच गायब होणे, नेटवर्कचा स्पीड कमी होणे,रिचार्ज च्या दरात दर महिन्याला वाढ होणे,अनेकदा कॉल रिंगटोन अर्धवट वाजून मधेच दुसरीकडे फोन लागणे अश्या सर्व समस्यांना सामान्य जिओ ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे.दररोजच्या या समस्यांमुळे जिओ ग्राहक त्रस्त झाले असून अनेकांची मोठी गैरसोय होत आहे.
जिओ नेटवर्कच्या दयनीय सेवेमुळे ग्राहकांना पाहिजे तशी सर्विस सेवा मिळत नसल्याने या भागातील शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणावाचून गैरसोय होत आहे.अनेक शालेय विद्यार्थी, शेतकरी बांधव, सायबर कॅफे, सेतू कार्यलये, बँक, शासकीय निमशासकीय कार्यालये, शासकीय योजना त्यांचे ऑनलाइन अर्ज,७/१२ खाते उतारे यासाठी सर्वांची मोठी गैरसोय होत आहे. तरी जिओ कंपनीने या सर्व समस्या तात्काळ सोडवाव्यात व सुरळीत योग्य प्रमाणात चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या परिसरातील ग्राहकांकडून होत आहे.
दरम्यान एका दिवसाला जिओ नेटवर्क गायब झाले तर जवळपास पन्नास हजारांच्या आसपास ग्राहकांच्या प्रतिदिन असलेल्या दीड जि बी डाटा व कॉलिंग मोबाईल नेटवर्कचे न भरून येणारे नुकसान होत आहे यात जिओ कंपनीचा प्रति दिन मोठा फायदा होतो पण त्याची झळ ही सामान्य ग्राहकांना बसते आहे.
दरम्यान टाकेद परिसरात धामणगाव, टाकेद ,खेड, परदेशवाडी, आंबेवाडी, इंदोरे, पिंपळगाव मोर ,आदी गावात विविध कंपनीचे नेटवर्क टॉवर आहे. त्यापैकी टाकेद सह अन्य ठिकाणी रिलायन्स जिओ नेटवर्क चे टॉवर असूनही नेटवर्क सेवा सुरळीत नाही. सर्रासपणे नेटवर्क सुविधेचा लपंडाव असल्याने अनेक ग्राहकांचे संपर्क होत नसल्याने गैरसोय होत आहे. त्यात या भागातील लाईट गेली की मोबाईल नेटवर्क गायब होतो व जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत नेतेवर्क सेवा बंद असते व लाईट येताच पुन्हा नेटवर्क सुविधा सुरळीत होते असा प्रकारही या भागात होतांना दिसतो आहे.
तरी संबंधित जिओ कंपनीच्या अधिकारी वर्गाने या प्रश्नांकडे लक्ष्य घालून हा मोबाईल नेटवर्क प्रश्न सोडवावा स्थानिक लोकप्रतिनिधी ,तालुका प्रशासन यांनी देखील या प्रश्नाकडे लक्ष्य घालावे व हा नेटवर्कचा लपंडाव प्रश्न सोडवावा अशी मागणी सर्व स्तरातील त्रस्त ग्रामस्थ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
“गेल्या दोन महिन्यांपासून टाकेद परिसरात जिओ नेटवर्कचा लपंडाव चालू आहे यामुळे wi-fi मोबाईल नेटवर्क सेवा ठप्प आहे.या गैरसोयीमुळे सामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत.”
– सुनील महाले ,जिओ ग्राहक टाकेद
“सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना घरीच राहून मोबाईलवर ऑनलाइन अभ्यास करावा लागत आहे परंतु सततच्या नेटवर्क समस्यांवाचून अनेक शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणात खंड पडला असून विद्यार्थ्यांचे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान होत आहे.”
– पंकज केवारे – बी एस सी अग्री विद्यार्थी मायदरा
“टाकेद भागात लाईट गेली की जिओ मोबाईल नेटवर्क गायब होतो व लाईट येताच पुन्हा सुरळीत होतो. गेल्या दोन महिन्यांपासून जिओ नेटवर्कचा सर्रासपणे लपंडाव चालू असल्याने मोबाईल ग्राहकांची मोठी गैरसोय होत असून सेतू कार्यालय,वाय फाय,शालेय ऑनलाइन कामकाज,बँक,ग्रामपंचायत सह शासकीय निमशासकीय कार्यलये यांचे ऑनलाइन काम ठप्प होत आहे.तरी हा नेटवर्क प्रश्न संबंधित कंपनीने तात्काळ सोडवावा अन्यथा जिओ ग्राहक सिम कार्ड दुसऱ्या कंपनीत पोर्टल करण्याच्या दिशेने आहे.”
-दिलीप बांबळे, सी एस सी केंद्र चालक टाकेद बु.
“मोबाईल हे सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचे साधन झाले आहे , इगतपुरीच्या पुर्व भागात बहुतांश ग्राहक हे जिओ नेटवर्कचेच आहेत त्यात नेटवर्क प्लॅन ची भरमसाठ वाढ झाली आहे, सध्याच्या काळात अत्यंत गरज असल्याने विद्यार्थी, शेतकरी , सर्वसामान्य व्यक्ती नाविलाजस्तव रिचार्ज करतात
या गैरसोयीमुळे विद्यार्थी, शेतकरी,सर्वसामान्य अत्यंत त्रस्त झाले आहेत
संबंधित जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या समस्येतून मार्ग काढावा.”
– कु. रुख्मिनी दुंदा जोशी घोडेवाडी-टाकेद
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम