द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : बहिणीने पळून जावून लग्न केल्याचा प्रचंड राग आलेल्या भावाने ती गावात पतीसह परत आल्याचे कळताच तिचे घर गाठले. (Aurangabad ) काही कळायच्या आतच त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने बहिणीच्या गळ्यावर सपासप वार केले. (Marathwada) विशेष म्हणजे हा हल्ला झाला तेव्हा त्याची आई देखील सोबत होती. (Murder) भावानेच बहिणीवर जीवघेणा हल्ला केल्याचे पाहून तिचा पती जीवमुठीत घेऊन पळाल्यामुळे त्याचा जीव वाचला.
सैराट चित्रपटातील शेवटच्या दृश्याची आठवण करून देणारा आणि अंगावर काटा आणणारा हा थरारक प्रसंग वैजापूर तालुक्यातील लाडगांव शिवारात घडला. बहिणीची हत्या करणारा अल्पवीन भाऊ आणि त्याच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किशोरी मोटे असे मृत पावलेल्या विवाहीत तरुणीचे नाव आहे.
सहा महिन्यापुर्वी किशोरी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. तीने आळंदी येथे त्याच्यासोबत विवाह देखील केला होता. मुलीच्या घरच्यांचा राग आता शांत झाला असेल असा विचार करून हे दोघे पती-पत्नी पुन्हा आपल्या गावी म्हणजेच लाडगांव शिवारात परतले होते. सुखी संसाराचे स्वप्न रंगवत असतांनाच बहिण पुन्हा गावात आल्याचे समजताच तिचा भाऊ आणि आई तिला भेटायला म्हणून लाडगांव शिवारात आले होते.
बहिणीला पाहताच भावाचा राग अनावर झाला, पळून जाऊन लग्न का केले? असा जाब विचारतच त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने बहिणीच्या गळ्यावर सपासप वार केले. यात बहिण जागेवरच गतप्राण झाली. तर तीचा पती जीव वाचवत पळून गेला. विशेष म्हणजे हा प्रकार मुलीच्या आईसमोरच घडला. हा प्रकार समजताच शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी मयत विवाहित तरुणीच्या भावासह आईला अटक केली. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
स्वतःच्या बहिणीला अश्या पद्धतीने मारणे म्हणजे किती अपमानास्पद आणि निर्घृण बाब आहे. कुटुंबातील प्रेम याला म्हणावे काय असा इथे प्रश्न पडतो. आपल्या अब्रूखातीर त्या भावाने त्या मुलीला मारले मात्र जीव एका मुलीचा गेला आहे. अशी घटना म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारी आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम