तुषार शिल्लक
द पॉईंट नाऊ विशेष : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पोतडिकीने ओरडणारे तथाकथित शहरातले साजूक तुपातील श्रीखंडपूरी जमातीतले साहित्यीक मात्र, शोषीत, श्रमिक, वंचीत, महिला, आदिवासींचा आवाज कधी बनूचं शकले नाहीत, फूलाचंद्रावर कविता लिहणार्यांना अडगळ वस्तीतलं जगणं दिसलं नाही, वृत्तात काव्य करणार्यांनी मुक्तछंदाला नेहमी हेटाळलं, सामाजिक जाणीवेत लाळघोटेपणा करणारे साहित्य निर्मीलं मात्र विद्रोह म्हणजे देशद्रोह, मुक्तछंद म्हणजे अडाणचोटपणा, दलित साहित्य म्हणजे जातीवाद, वाड्या वस्त्या, पिचलेली माणसं शोषीत बायका म्हणजे साहित्याला लागलेली बुरशी..
अश्या माणसीकता असलेल्या लोकांचे ९४ वे साहित्य संमेलन नुकतेच नाशिक मध्ये पार पडले,राजाश्रय ,भरघोस निधीची खिरापत,आपलेच बगलबच्चे आमंत्रीत कवी, पाहुणे, संयोजक. तरी दूसरीकडे १ रूपया व मुठभर धान्य हीचं आमची शिदोरी म्हणत संविधानाच्या सन्मानार्थ १५ वे विद्रोही साहित्य संमेलन सोबतचं पार पडले. ज्यांना सारस्वतांनी झिडकारले, ज्यांचं गावाकडलं, दूखाचं, पारंपारिक जिवनशैली असलेले विद्रोही साहित्य नाकारलं त्यांच संमेलन खरं तर भाव खाऊन गेलं.
जिथे करोडो रूपये खर्चूनही प्रेषक दालनात बसायला तयार नाहीत, साहित्य संमेलन म्हणजे सेल्फी पॅांईंट आणी फिरणे एन्जोय करणे, जे कवी तेच रसिक असं चित्र असतांना तिकडे साहित्यीकां बरोबर वाड्या वस्त्यावरील बाया बापडे बसून होते, ऐकतं होते, दाद देत होते. ही वैचारीक तफावत असली तरी ही भिषणता बोलकी आहे, देखणी आहे. मुळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जरूर मिळावा त्यासाठी विद्रोही साहित्याला देखील या प्रवाहात सामावून घ्यावं लागेल.
अस्पृश्यता आता राहिलीचं कुठे? असं छातीठोकपणे सांगणारे साहित्यातल्या या अस्पृश्यतेचं बद्दल काय सांगतील? आमचं एक तुमचं वेगळं ही तफावत मराठी साहित्याला मारक आहे. साहित्य संमेलन आणी वाद ही गोष्ट आता नवी नाही परंतु यंदाच्या ह्या साहित्य संमेलनात जातीयवाद मोठ्या प्रमाणात दिसून आला आणी सोशल मिडीयावर तो ट्रोलही झाला. काळजी फक्त एका गोष्टीची वाटते आहे की नव्याने लिहू लागलेल्य् कवींनी साहित्यीकांनी नेमकी कुठली भूमिका घ्यावी हा मोठा यक्ष प्रश्न त्यांना पडू नये एवढचं….
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम