Maharashtra Politics | राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार.?; काही मंत्र्यांना डच्चू तर, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार

0
87
Rajyasabha Eelection
Rajyasabha Eelection

Maharashtra Politics |  काल नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. केंद्रात मंत्री मंडळ स्थापन झाले असून, रविवारी दिल्लीत भाजप प्रणित एनडीए सरकारच्या ७२ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी राज्यातील ६ खासदारांची मंत्रीमंडळात वर्णी लागली. दरम्यान, येत्या ३ ते ४ महिन्यांत महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी पाहता महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार असल्याची माहिती समोर आली आहे. २७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून, पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)

वर्ष उलटले तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही

अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यावेळी २ जुलै २०२३ रोजी मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. यावेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांना मोठ्या संधी देण्यात आली होती. यानंतरदेखील एक छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार झाल्याची चर्चा होती. मात्र, आता तब्बल वर्ष उलटत आले असून, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.

Maharashtra Politics | महाराष्ट्रात राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’..?; उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी

Maharashtra Politics | केंद्रात मंत्रीपद न दिल्याची भरपाई राज्यात

तसेच लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला कमी जागा मिळाल्या. तसेच महायुती सरकारमध्ये अजित पवार गटावर दबाव टाकला जात असल्याची कुजबूज असल्याने त्यांच्या गटात नाराजीचे वतावरण आहे आणि अनेक आमदार नाराज असल्याचीही मध्यंतरी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या आग्रहापोटी हा मंत्रीमंडळ विस्तार होत असल्याचीही चर्चा आहे. दिल्लीत रविवारी भाजप प्रणित एनडीए सरकारच्या मंत्री मंडळात ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली आणि यात शिंदे गटाला केवळ एक राज्यमंत्रीपद आणि अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळाले नसल्याने याची भरपाई आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात केली जाणार असल्याची चर्चा आहे. (Maharashtra Politics)

चांगली कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना डच्चू

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याने पक्षातील नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी १५ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची मागणी अजित पवारांनी केली होती. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकाराचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार असून, ही खांदेपालट करताना चांगली कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे.(Maharashtra Politics)

Maharashtra Politics | भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण..; भाजपकडून भुजबळांना घरचा आहेर

भाजपकडून तरुण चेहऱ्यांना संधी

तर भाजपकडून यावेळी तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता असून, शिंदे पवार गटाकडूनही कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची ऑफर मिळणार हे पहावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या पक्षांमधील नेते मंडळींची नाराजी दूर होऊन त्यांच्यात उत्साह निर्माण होण्यासाठी दिग्गजांकडून हा खटातोप केला जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here