Nashik Lok Sabha | नाशिकच्या शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतीत ठाकरेंच्या शिवसेनेने बाजी मारली आणि शिंदेंच्या खासदाराची हॅटट्रिक हुकली. केवळ नाशिकच नाहितर शेजारील दिंडोरी, धुळे, अहमदनगर, शिर्डी या मतदार संघातही महायुतीला पराभवाची धूळ चाखावी लागली. मात्र, यात शिंदे गटाने आत्मपरीक्षण करणे सोडून शिंदे गटाचे नेते हे उलट आपण कसे उजवे आहोत हे सांगत ठाकरे गटाला आत्मपरीक्षण करण्याचे सल्ले देताना दिसले. (Nashik Lok Sabha)
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या शहरातील प्रचाराची धुरा ही शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या खांद्यावर होती. मात्र, आपला हक्काचा गड राखण्यात ठाकरे गटाला अपयश आले असून, याविषयी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोरस्ते यांनी ठाकरे गटाला हुरळून न जाता आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
ठाकरे गटाच्या तुलनेत आमचा स्ट्राइक रेट जास्त
यावेळी ते म्हणाले की,”या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने १५ जागा लढवल्या आणि सात जागांवर आमचा विजय झाला. तर, ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या आणि केवळ ९ जागी त्यांचा विजय झाला. त्यामुळे ठाकरे गटाच्या तुलनेत आमच्या पक्षाचा स्ट्राइक रेट हा जास्त आहे. ठाकरे गटाचे उमेदवार केवळ काँग्रेसच्या मतदारांमुळे विजयी झाले असून, ही मतं ठाकरे गटाने आपली समजू नये. ज्यावेळी काँग्रेसशी फारकत होईल तेव्हापासून ही मतंही ठाकरे गटापासून दूर जातील. त्यामुळे ठाकरे गटाने हुरळून न जाता आपले आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला अजय बोरस्ते यांनी दिला आहे. (Nashik Lok Sabha)
Nashik News | आत आजी माजी खासदारांची ‘गळाभेट’; बाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
महाविकास आघाडीने मतदारांची दिशाभूल केली
तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीत संविधानाविषयी अफवा पसरवून मतदारांची दिशाभूल केली. तर याच आधारे ठाकरे गटाने दलित आणि मुस्लीम मतांच्या जोरावर विजय मिळवला. मतदारांना संविधानविषयक फसवणूक झाल्याचे समजल्यास महाविकास आघाडी आपला आहे तो मतदारही गमावेल, असा विश्वास अजय बोरस्ते यांनी व्यक्त केला. तर आगामी काळात संविधानाबाबत महाविकास आघाडीने केलेला खोटा प्रचार आपण नागरिकांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Nashik Lok Sabha | त्यामुळे आम्ही प्रचारात कमी पडलो…
भाजप उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर महिनाभरानंतर आमच्या उमेदवारांची घोषणा झाली. मात्र तोपर्यंत विलंब झालेला होता. १५ ते १८ दिवसांत प्रचार करणे हे कठीण होते. पण तरीही आम्ही प्रचार केला. घटक पक्षातही अनेकजण इच्छुक होते. त्यांची नाराजी दूर करण्यातही खूप वेळ गेला. त्यामुळे आम्ही प्रचारात कमी पडल्याची खंत बोरस्ते यांनी बोलून दाखवली. महायुतीकडून चुका झाल्याची कबुली देत येणाऱ्या काळात चुका सुधारून नव्याने पक्ष बांधणी करू आणि नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचेही बोरस्ते यांनी सांगितले.
ग्रामीण भागात शेतीमाल, कांदा, द्राक्ष, पाणी यासह विविध प्रश्नांचा आम्हाला फटका बसला. याशिवाय विरोधकांनी संविधानासह खोटी माहिती पसरवून नॅरेटिव्ह सेट केले. त्यावर वेळ कमी असल्याने आम्हाला काम करता आले नाही. याचा फटका ग्रामीण भागात बसल्याची कबुलीही अजय बोरस्ते यांनी दिली. (Nashik Lok Sabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम