नाशिक : सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघात (Nashik Lok Sabha Election) तिरंगी लढत होत असून, येथे महायुतीचे हेमंत गोडसे, मविआचे राजाभाऊ वाजे, अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात थेट लढत असणार आहे. तर, आज नाशिकमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान होत असून, तिन्ही उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान, मतदानाच्या दिवशीच निवडणूक आयोगाकडून शांतिगिरी महाराजांवर (Shantigiri Maharaj) गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सकाळीच त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन व पूजापाठ करून मतदान केले. मात्र, यावेळी महाराजांनी थेट ईव्हीएमला (EVM) हार घातला.
या प्रकरणी आता त्यांच्यावर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. मतदान केल्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला (EVM) घातला. याप्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी येथीलच कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केले. येथे मतदान केल्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला.
Shantigiri Maharaj | भाजपचा शांतीगिरी महाराजांना पाठिंबा..?; महाराजांचा मोठा गौप्यस्फोट
मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण, शुद्ध भावनेतून पूजा
यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणले की,”आम्ही सर्व गोष्टींमध्ये देव बघत असतो, या ईव्हीएम मशीनमध्येही देव आहे. तसेच त्यांनी यापूर्वी मतदान केंद्राबाहेर बेलफुल वाहत पुजा केली व वंदन केले. यामुळे त्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले. तर, यावर मतदान केंद्र हे एक पवित्र ठिकाण आहे आणि आम्ही येथे शुद्ध भावनेतूनच पूजाअर्चा केल्याचे स्पष्टीकरण शांतिगिरी महाराजांनी दिले.(Shantigiri Maharaj)
Shantigiri Maharaj | नेमकं काय घडलं..?
शांतीगिरी महाराजांनी आज सकाळी सात वाजता त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान केल्यानंतर तेथील मतदान अधिकाऱ्यांनी त्यांच्या बोटाला शाई लावली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या गळ्यातील हार काढून तो ईव्हीएम मशीनला घातला. हा आदर्श आचार संहितेचे उल्लंघन असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या घटने संदर्भातील माहिती मागवण्यात आली आहे.
Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराजांनी गुन्हा लपवला..?; उमेदवारीचे भवितव्य धोक्यात
त्र्यंबकेश्वराने मला आशीर्वाद दिले, माझा विजय निश्चित
उमेदवारांनी देवदर्शन करत आपला मतदानाचा हक्क बजावला असून, शांतिगिरी महाराज यांनीही सकाळी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या अभिषेक करत पूजाविधी केला. यावेळी आपल्याला त्र्यंबकेश्वराने आशीर्वाद दिले असून, माझा विजय निश्चित असल्याचे मत शांतीगिरी महाराज यांनी यावेळी व्यक्त केले.(Shantigiri Maharaj)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम