Nashik Loksabha | नाशिक लोकसभेत गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत नाराजी नाट्य सुरू होते. ते संपते कुठे तर, आता ठाकरेंच्या शिवसेनेतील नारजी चव्हाट्यावर आली आहे. ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय करंजकर हे नाराज होते. तीन वेळेस मातोश्रीवरून त्यांची मनधरणी करण्यासाठी बोलावणे आले. मात्र, त्यांनी ठाकरेंकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात होते. वाजेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी “आपण निवडणुक लढवणारच आणि समोरच्यांना पाडणार” असा निर्धार केला होता. (Nashik Loksabha)
Nashik Loksabha | नाशिकच्या उमेदवारीसाठी केदा आहेरांचा विचार न झाल्याने कार्यकर्ते नाराज..!
Nashik Loksabha | अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि आजच शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांनी बंडखोरी केली करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विजय करंजकर यांच्या वतीने रोहिदास करंजकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
वेळोवेळी नाराजी बोलून दाखवून व बंडाचा इशारा देऊनही पक्षाने दखल घेतली नाही. त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर, त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर पक्षातूनच आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, करंजकर यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान ठाकरे गटापुढे असून, आता करंजकर माघार घेणार की उमेदवारी कायम ठेवणार हे पहावे लागणार आहे.(Nashik Loksabha)
Nashik Loksabha | भुजबळ नाराज..?; भुजबळांच्या भेटीला गोडसे का आले नाही..?
मुख्यमंत्री व गिरीश महाजन यांची भेट झाली
दरम्यान, यावर बोलताना करंजकर म्हणाले की,”आज आपण अर्ज दाखल केला असून, गेल्या दोन दिवसात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहे. मातोश्रीवरून भेटीसाठी तीन वेळा बोलावलं होतं. पण जाण्याच्या आधीच आपल्याला फोन करुन आज नको येऊ, असे सांगितले होते. ३५ गरसेवक आणि ४ जिल्हा परिषद सदस्य हे आपल्यासोबत असल्याचा दावा देखील यावेळी करंजकर यांनी केला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गिरीश महाजन यांची भेट झाली आहे, असेही ते म्हणाले.(Nashik Loksabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम