Solapur | थरारक..! जमिनीच्या वादातून चुलत्याला संपवून; पुतण्या शीर घेऊन फरार

0
45
Solapur
Solapur

Solapur |  जमिनीच्या वादातून मुलाने बापाला संपवल्याची घटना ही नुकतीच जळगाव मध्ये घडल्यानंतर आता सोलापूर मध्ये पुन्हा जमिनीच्या वादातून पुतण्याने सावत्र काकाला संपवल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना सोलापूर मध्ये घडली आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी घडलेली असून, शेतीच्या वादावरून पुतण्याने सावत्र चुलत्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत, त्याचा गळा कापला.

एवढेच नाही तर, त्याने कुऱ्हाडीच्या सहाय्याने शीर हे शरीरापासून वेगळे केले. आणि चुलत्याचा अशा निर्घृणरित्या खून करून आरोपी पुतण्या हा मुंडके घेऊन पळाला होता. दरम्यान, हा संपूर्ण खुनाचा थरार सोलापूरमधील माढा तालुक्याच्या शेवरे येथील कुरणवस्ती येथे सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला असून, निर्दयी आरोपी हा मुंडके घेऊन फरार असल्याची माहिती मिळताच सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते.

Nashik Crime | नाशिकच्या माजी आमदाराला कट मारणे तिघांना भोवले

सोमवारी दिवसभर टेंभुर्णी पोलीस हे त्या मृत शरीराचे शीर शोधत होते. दरम्यान, आरोपीने घटनास्थळापासून दहा किमी अंतरावरील एका मक्याच्या शेतात त्या शरीराचे मुंडके फेकून आरोपी फरार झाला होता. संध्याकाळच्या दरम्यान, हे मुंडके मिळालयानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर आज अंतिम संस्कार होणार आहेत. या प्रकरणी आरोपींपैकी एका जणाला टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

जमिनीमुळे रचला हा खुनी थरार

अधिक माहितीनुसार, मयत शंकर जाधव आणि आरोपी शिवाजी जाधव ह्या काका-पुतण्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जमिनीचा वाद हा सुरू होता. त्याचाच राग धरून शिवाजी जाधव, परमेश्वर जाधव, आकाश जाधव, अजित जाधव ह्या चारही भवांनी चुलते शंकर जाधव यांचा काटा काढायचे ठरवले. ते सोमवारी सकाळी चुलत्याच्या घरी गेले असता, शिवाजी जाधव याने कुऱ्हाडीने वार करून शंकर जाधव यांचे मुंडके धडावेगळे करत निर्घुणपणे खून केला.

Crime news | ८ मुलीच झाल्या म्हणून पतीचा छळ; पत्नीने शेजाऱ्यालाच दिली सुपारी

मुंडके घेऊन दुचाकीवरून फरार

ह्या प्रकरणी चार भावांनी मिळून सावत्र चुलत्याला संपवल्याचा हा थरार तब्बल पाऊण तास सुरू होता. आरोपी शिवाजी जाधव याने चुलते शंकर जाधव यांच्यावर कुऱ्हाडीने वार करत त्यांना ठार केले व कुऱ्हाडीने त्यांचे मुंडके हे धडावेगळे केले. आणि हे मुंडके घेऊन खूनी मोटारसायकलवरून फरार झाला.

मयत शंकर जाधव यांच्या पश्चात त्यांच्या परिवारात दोन मुले, दोन मुली, पत्नी हे आहेत पण, घटना घडताना येथे कुणीही नव्हते हे बारे झाले नाहीतर, मोठा हत्याकांड घडला असता अशी चर्चा परिसरात सुरू होती. या प्रकरणी, पोलिसांनी शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव व अजित बाबासाहेब जाधव ह्या चारही भावांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास टेंभुर्णी पोलिस करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here