‘देऊळ’ बंद, ‘शाळा’ बंद ; हौशी पर्यटकांसाठी ‘बोटक्लब’ मात्र सुरू

0
42

नाशिक प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील निर्बंध टप्प्या टप्प्यात खुले करण्यात येत आहेत. शहरातील गंगापूर धरणातील बोटक्लब अखेर पर्यटकांसाठी खुला होणार आहे. यामुळे पर्यटकांना दिलासा मिळणार आहे. पन्नास टक्के क्षमतेने हा बोटक्लब सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. करोना नियमांचे पालन करून ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून पर्यटकांना जाता येणार आहे. यामुळे हौशी पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.

सध्या नाशिक अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे. नाशिक जिल्ह्यात रात्री 8 वाजेपर्यंत व्यवहार सुरु आहेत. नियमांचे पालन मात्र अनिर्वार्य आहे. हॉटेलसाठी बंधने घालून देण्यात आलेत तर रेस्टॉरंटसचा निर्णय घेणे आपल्या हातात नाही. करोनाविरुद्ध लढण्यासाठी एकीकडे पाऊले उचलली जात असतानाच हे सुरु करा ते सुरु करा अशा दररोज मागण्या होत आहेत. मात्र, काही निर्णय राज्यस्तरावर घेण्यात येणार असून मुंबईच्या टास्क फोर्स याबाबतचे निर्णय घेणार आहे. असे सांगत रेस्टॉरंटबाबतचा निर्णय टास्क फोर्स घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

काल नाशिक शहरासह ग्रामीण भागात डेल्टा व्हायरसचे 30 रुग्ण आढळून आलेत. रात्री 8 वाजेपर्यंत वेळ असली तरी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. जिल्ह्यातील शाळा सुरु आहेत, मात्र एक महिन्यात करोना रुग्ण नसलेल्या ठिकाणी शाळा सुरु आहेत, तर अनेक शाळा रुग्ण आढळून आल्याने बंददेखील करण्यात आल्यात म्हण काळजी घेणं हाच पर्याय असून त्याच काटेकोरपणे पालन होणं गरजेचं आहे.

शाळा सुरु करण्याबाबत संस्थाचालक तयार….

शाळा सुरू करण्यासाठी संस्थाचालकांनी तयारी दर्शवली आहे. मात्र शिक्षण विभाग जो निर्णय घेईल त्याकडे लक्ष लागून आहे. एक महिन्यात एकही रुग्ण नाही असे नियम पाळले पण काही ठिकाणी एखादे पेशंट सापडले तर त्या ठिकाणच्या शाळा बंद पडल्या आहेत.हे देखील विसरुन चालणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण मंत्र्यांकडून जे काही निर्णय होतील त्यांची अंमलबजावणी केली जाईल. याव्यतिरिक्त जिल्ह्यात वेगळे काही बदल करू इच्छित नाहीत. हे चालू केले दोन दिवसांनी बंद असे आता करता येणार नाही. जी माहिती आली आहे त्यातून असे दिसते की तिसरी लाट कमी वेळेत पसरते असे दिसते आहे. त्यामुळे हे सुरु करा ते बंद करा अशी मागणी होते आहे. पण आपल्याला काही बंधने पाळावी लागतील. विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. महापालिका हद्दीतील निर्बंध शिथिल करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे भुजबळांनी सांगितले.

शहरातील शाळा बंदच…

शहरात करोनाची रुग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळे येथील शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय झालेला नाही असे भुजबळांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here