
– अंकिता जाधव
NCP Udyakumar aher: देवळा तालुक्यातील उदयकुमार आहेर यांचा प्रवास नेहमीच वेगळेपण दर्शवणारा राहिला, कधीकाळी देवळा शहरात राजकीय संस्थानिकांना आवाहन देत आपले वर्चस्व प्रस्थापित करत ग्राम पालिकेत आपला विजय संपादन केला. वक्तृत्वाच्या जोरावर आहेर यांनी राजकीय विरोधकांची भीडभाड ठेवली नाही राजकीय आखाड्यात धूळधाण उडवली, मात्र प्रत्येकालाच अंगावर घेण्याच्या सवयीने अनेक आरोप होत बदनामीला सामोरे जावे लागले. विरोधाला विरोध करण्याचे काम उदयकुमार करतात आर्थिक तडजोड त्यांच्या आंदोलनातून होते असे असह्य आरोप त्यांच्या एकेकाळच्या सहकार्यानकडून अन् विरोधी नेत्यांकडून होत राहिले. या आरोपांची तमा न बाळगता आपला धमाका सुरूच ठेवत आज उदयकुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मजल मारली. मात्र इथपर्यंत आहेर कसे पोहचले हे समजावून घेणे महत्वाचे आहे.
कांद्याला भाव नाही चाळीतील कांदा सडला म्हणून देवळा तालुक्यात युवा शेतकऱ्याची आत्महत्या
उदयकुमार आर्थिक दृष्ट्या मध्यमवर्गीय, कार्यकर्ता उभा करण्यासाठी पैसा लागतो तो त्यांच्याकडे नाही, मी वैचारिक आणि निर्भिड कार्यकर्त्यांना उभे करू शकतो मात्र ठेकेदारी वृत्तीच्या कार्यकर्त्यांना नव्हे असे ठणकावून बोलत असल्याने कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली नाही. मराठा आरक्षणावर राज्यभर चळवळ उभी करून स्वर्गीय विनायकराव मेटेंच्या नेतृत्वात राज्यभर काम केले. काही तत्व सोडले नाहीत म्हणून आर्थिक घडी बसवू शकले नाहीत. कदाचित विरोधकांच्या आरोपानुसार आंदोलनातून आर्थिक तडजोडी झाल्या असत्या तर नक्कीच चित्र वेगळे दिसले असते मात्र आर्थिक दृष्ट्या सामान्य असलेल्या उदयकुमारांना अजित दादांनी थेट राज्याच्या पदावर विराजमान का केले हा देखील प्रश्न अनेकांना पडला कारण राजकारण म्हटले की पैसा महत्वाचा आहे.
उदयकुमार कुठल्याही पदावर नाहीत, त्यांच्या पत्नीचा देवळा नगरंपचायतीच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला, त्या आधी जिल्हा परिषदेत झाला. या आधीच्या नगरंचायतीच्या निवडणुकीत ते स्वतः पडले, ‘एक रुपया देणार नाही एक रुपया खाणार नाही’ या घोषणेवर निवडणूक लढवली आणि त्यात जनतेने त्यांना नाकारलं, मुद्दा हाच येतो की आहेर यांच्याकडे साधी कुठली पतसंस्था देखील नाही की बाजार समिती नाही मग अशा उदयकुमार आहेर यांच्यामध्ये राष्ट्रवादी नेतृत्वाने नेमक काय हेरल? राष्ट्रवादीला काय फायदा होणार आहेर यांची ही राजकीय भूमिका येणाऱ्या काळात त्यांना फलदायी ठरणार का हे येणाऱ्या काळात लक्षात येईलच. (NCP Udyakumar aher)
शिवसंग्राम संघटनेचे 22 जिल्ह्यांचे महत्वाचे पदाधिकारी उदयकुमार आहेर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले. याचा अर्थ स्थानिक स्थरावर त्यांची बाजू कमकुवत असेल मात्र राज्य पातळीवरील मजबूत आहे. यामुळेच राज्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आहेर यांच्या सोबत आले. अजित दादा कसलेले राजकारणी आहेत कुणाच्याही हाती पद देणार नाही. त्यांनी नेमक काय हेरल हे बघणे महत्वाचे आहे.
आहेर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना भविष्यात नाशिक जिल्हा राष्ट्रवादी किती सहकार्य करते हे बघणे महत्वाचे असेल. त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागेल. कार्यकर्त्यांची फळी उभी करावी लागेल. पद आले म्हणून हुरळून न जाता आपल्या समोरील आवाहनाला कसे सामोरे जाता यावरून त्यांचे राजकीय भविष्य ठरणार आहे. उदयकुमारांचा पुन्हा राजकीय उदय झाला आहे. राजकारण संपले म्हणणाऱ्यांना ही चपराक आहेच. मात्र या संधीचे सोने करून होम ग्राउंड कडे लक्ष देत राज्यभर एक फळी निर्माण करावी लागणार आहे. पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार आहेर यांना पाऊले टाकत प्रोफेशनल वावर त्यांच्याकडून अपेक्षित आहे. त्यांना सोशल मीडियापासून अन्य बरेच बदल करावे लागणार आहेत अन्यथा पद शोभेच राहील असेही व्हायला नको. हे पद आत्मिक समाधानासाठी नसून पुन्हा उभारी घेण्यासाठी आहे, हेकेखोर पणा सोडून आयुष्यात काही तडजोडी कराव्याच लागतील राजकारणात यशस्वी व्हायचे असल्यास फक्त तत्व चालणार नाहीत तर अन्य बाबींनी सक्षम होणे आवश्यक आहेत, येणाऱ्या सहा महिन्यात आपण सवतःला काय सिद्ध करता यातून भविष्याची वाटचाल दिसेल. असो ते राज्याचे नेते झालेत हे जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे त्यांना सदिच्छा अन् शुभेच्छा ! (NCP Udyakumar aher)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम